शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रुग्णवाढीच्या गतीपेक्षा बरे होण्याचा वेग जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 5:00 AM

भारतात संसर्ग वाढत असला, तरी तीव्रतेत घट : रुग्णांची संख्या १५ दिवसांत, तर बरे होणारे १२ दिवसांत दुप्पट; मृत्यूदरही होतोय कमी

अमोल मचाले।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अवघ्या १५ दिवसांत देशात ‘कोविड-१९’च्या रुग्णांनी एका लाखावरून दोन लाखांचा टप्पा गाठला असल्याने चिंतेत भर पडली आहे. असे असले, तरी उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रुग्णांच्या गतीपेक्षाही वेगाने वाढले आहे. याच काळात देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १२ दिवसांत दुप्पट झाले आहे. शिवाय, एकूण रुग्णांमधील; तसेच ‘क्लोज केसेस’मधील घटलेले मृतांचे प्रमाण पाहता, देशात रुग्ण वेगाने वाढत असले, तरी या रोगाच्या तीव्रतेत घट होत असल्याचे स्पष्टपणे दिसते.

देशात ‘कोविड-१९’ रुग्णसंख्येने मंगळवारी (दि. २) २ लाखांचा टप्पा ओलांडला. १ लाखाचा टप्पा १८ मे रोजी गाठल्यानंतर, १५ दिवसांत देशातील रुग्णसंख्या दुप्पट झाली. याच वेळी उपचारानंतर बरे होणाऱ्यांच्या संख्येचा विचार करता वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण होणारी चिंता नक्कीच कमी होण्याजोगी स्थिती आहे. मंगळवारी संध्याकाळी ७ पर्यंत ९६ हजार ५३४ जण बरे झाले आहेत. १८ मेपर्यंत ३९ हजार २७७ रुग्ण बरे झाले होते. या काळात दुपटीने रुग्णवाढ झाली असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे अडीच पटीने वाढले आहे.

एकूण रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदराचा विचार करता १५ दिवसांत तो ३.१४ वरून २.८० टक्क्यांपर्यंत कमी झाला. याच काळामध्ये एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचार सुरू असलेल्यांचे प्रमाण ८.५४ टक्क्यांनी कमी झाले आहे. (अधिक माहितीसाठी पहिला तक्ता बघावा).उपचाराचे निष्कर्ष (बरे झालेले वा मृत) हाती आलेल्या संख्येचा अर्थात ‘क्लोज केसेस’चा विचार करता या १५ दिवसांत बरे होणाºयांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. यासोबत मृतांचे प्रमाणही कमी झाल्याचे दुसºया तक्त्यावरून दिसते. देशात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी ‘क्लोज केसेस’मध्ये बरे होणाºयांचे प्रमाण वाढणे आणि मृतांचे प्रमाण कमी होणे, हे संसर्गाची तीव्रता कमी होत असल्याचे निदर्शक आहे.महाराष्ट्रात बरे होणाºयांचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले !देशाच्या रुग्णसंख्येप्रमाणे महाराष्ट्रातील रुग्णसंख्यादेखील १५ दिवसांत दुपटीने वाढली; मात्र या काळात बरे होणाºयांचे प्रमाण देशापेक्षा जास्त भरते. १८ मे रोजी राज्यात ३५ हजार ५८ रुग्ण होते. त्यापैकी ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले. मंगळवारी सायंकाळी ७ पर्यंत आढळलेल्या एकूण ७० हजार १३ रुग्णांपैकी ३० हजार १०८ जण उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देऊन बरे झाले. १८ मेच्या तुलनेत बरे होणाºयांचे हे प्रमाण साडेतीन पट जास्त आहे.एकूण रुग्णांमध्ये मृतांचे प्रमाण ३.५६ वरून ३.३७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत एकूण रुग्णांपैकी बरे होणाºयांचे प्रमाण २४.०६ टक्क्यांवरून थेट ४३ टक्क्यांवर गेले आहे.उपचारानंतरच्या ‘क्लोज केसेस’चा विचार करता देशाप्रमाणे राज्यातदेखील ‘कोविड-१९’ची तीव्रता कमी होत असल्याचे स्पष्ट होते. यात मृतांचे प्रमाण १२.८९ वरून ७.२७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. बरे होणाºयांच्या प्रमाणात १८ मे रोजी ८७.११ होते. ते आता ९७.१३ टक्के असे प्रभावीपणे वाढले आहे.नागरिकांनी घाबरू नये, पण संकट टळलेले नाहीरुग्णांची संख्या २ लाखांवर गेल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये; पण संकट टळलेले नाही. मास्क घालणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग ही मूलतत्त्वे पाळणे अनिवार्य आहे; अन्यथा ‘सेकंड वेव्ह’ येऊ शकते. ती अधिक भयानक असेल. मास्क की व्हेंटिलेटर, याची निवड आपणकरायची आहे.- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्टसंथ गतीने का होईना, उद्रेक नियंत्रणात येतोय...एकूण रुग्णांतील बरे होणाºयांचे वाढते प्रमाण आणि मृतांचे कमी झालेले प्रमाण, या गोष्टींवरून संथ गतीने का होईना ‘कोविड-१९’चा उद्रेक नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट होते. २ लाख रुग्ण झाले असले तरी प्रसाराचा दर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. मार्चमध्ये तो ४ पट होता. आता तो १.२३ पर्यंत खाली आला आहे.- डॉ. प्रदीप आवटे, राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस