शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 16:46 IST

आगामी विधानसभेत महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून ताकदीनं या निवडणुका जिंकू असा विश्वास खासदार सुनील तटकरेंनी व्यक्त केला. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासून सोशल मीडियात अजित पवारांविरोधात जाणीवपूर्वक टार्गेट करण्याची मोहिम काहींनी सुरू केली. त्याबाबत आता आम्ही सतर्क आहोत. लवकरच याबाबत योग्य कारवाई करू असा गंभीर आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे म्हणाले की,  गेल्या ७-८ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबाबत वेगळा संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा केला, कुणीही आत्मविश्वास गमावला नाही. लवकरच आम्ही राज्याचा दौरा करणार आहोत. अधिवेशनानंतर अजित पवारही राज्यभरात फिरतात. सोशल मीडियावर जो अपप्रचार केला जात आहे त्याबाबत आम्ही सतर्क आहोत. अजितदादांना टार्गेट करण्याची विशेष मोहिम काहींकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. आमदारांची बैठकीत सगळे आमदार उपस्थित होते. केवळ नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी गेल्या ४० वर्षात अनेक निवडणुका जवळून पाहिल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीची समीकरणे वेगळी असतात. येणाऱ्या विधानसभेतही वेगळी समीकरणे दिसतील. लोकसभेत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. नेमकं निवडणुकीत काय काय घडलं, ज्याचा परिणाम निकालावर झाला, त्याचा आढावा घेतला जात आहे. लोकसभेत वेगवेगळे मतदान होते, विधानसभेत स्थानिक पातळीवर जनता विचार करत असते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे असं तटकरेंनी म्हटलं. 

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या कारणामुळे आम्ही मागे पडलो, त्या त्रुटी भरून महायुतीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर विधानसभेला जाणार आहोत. यावेळी निवडणुकीचे निकाल काय लागतील याबाबत साशंकता सगळ्यांनाच होती. निवडणुकीचे अंदाज कुणाला नव्हते. मतदारांमध्ये काय विचार होते कळत नव्हते. प्रत्येक निवडणूक काही ना काही शिकवत असते तशी या निवडणुकीनं आम्हाला काय करायचे आणि काय नाही हे शिकवलं आहे असं तटकरे म्हणाले. 

आम्ही जे बोलतो, त्यावर आव्हाडांनी शिक्कामोर्तब केलं 

नगरला कार्यक्रम झाला, त्यात जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं, ४ वेळा अजित पवारांना शरद पवारांनी वेडं बनवलं..हे त्यांच्या भाषणातील शब्द आहेत. जे आम्ही वर्षभर सांगत होतो, २०१४, २०१६, २०१९ आणि २०२२ असेल, राजीनामा दिला असेल त्या त्या वेळी भाजपासोबत जायचं हे ठरलेले होते. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता. त्याबाबत आव्हाडांनी वेगळ्या भाषेत का होईना पण शिक्कामोर्तब केले. बोलण्याच्या ओघात सत्य बाहेर आलं असं सुनील तटकरेंनी सांगितले. 

त्यासोबतच त्या कार्यक्रमात पक्षात खदखद किती हे या निमित्ताने बाहेर आले. जयंत पाटील ६ वर्ष प्रदेशाध्यक्ष आहेत. ४ महिने थांबा असं त्यांना व्यासपीठावर सांगावे लागले. सोशल मीडियावर काय बोलू नका. ज्या काही तक्रारी करायच्या त्या शरद पवारांकडे करा असं सांगावे लागते. निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राष्ट्रीय अध्यक्षांसमोर या भावना बोलाव्या लागतात त्याचा अर्थ काय याचे विश्लेषण मला करण्याची आवश्यकता नाही. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये. अनेकजण आमच्याही संपर्कात आहेत. परंतु आता महाराष्ट्रात सहानुभूती निर्माण झाली तर ती अजित पवारांच्या बाबतीत होईल असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.  

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस