शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं गणेशोत्सव मंडळांना विशेष आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 7:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत आधुनिक भारत घडवण्याची संकल्पना मांडली आहे, हा भारत कसा असावा यावर आधारित देखावे यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशमंडळानी सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाना केले.

पुणे,दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत आधुनिक भारत घडवण्याची संकल्पना मांडली आहे, हा भारत कसा असावा यावर आधारित देखावे यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशमंडळानी सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंडळाना केले.येत्या 2022 साली देश अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्याचा नारा दिला त्याचा उपयोग सुराज्यासाठी करण्याचा विचार करावा असेही ते म्हणाले.  महानगरपालिकेच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिन्याभर आयोजित विविध उपक्रमांचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.  

वादाला पूर्णविरामलोकमान्य टिळक, खासगीवाले, बिनीवले, पाटणकर, भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. एक राजकीय विचार घेऊन टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक चळवळीचे स्वरूप दिले. तरीही टिळकांसह सार्वजनिक गणेशोत्सवात एकत्रित आलेल्यांचे योगदानही नाकारता येत नाही. आज देशावर विविध संकटांचे सावट आहे, सामाजिक बांधिलकी जपणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे शतकोत्तर रौप्यमहोत्सवातील उद्भवलेल्या टिळक आणि शिवराय या वादाला मी पूर्णविराम दिला असल्याची जाहीर स्पष्टोक्ती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. दरम्यान, यावेळी महापौर, पालकमंत्री यांनी भाषणात भाऊसाहेब रंगारी यांचे आवर्जून नाव घेतले, मात्र मुख्यमंत्र्यांनी रंगारी यांचा उल्लेख टाळला.   

मुख्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना प्रेमळ सल्ला कायदा पाळा पण जरा प्रेमाने,कारण हा एक सांस्कृतिक उत्सव आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना मृदू भाषेत सल्ला दिला. मात्र हे सांगताना काहीही करण्याची परवानगी मंडळानाही नाही, अशी समजही त्यांनी यावेळी मंडळांना दिली.  

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव