शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

काही निर्णय अद्याप यायचेत, सरन्यायाधीशांनी आमच्यासाठी सोपे केले; शरद पवारांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 4:39 PM

राज्यपालांनी जे नुकसान करायचे ते करून गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नाव राहिल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या निकालानंतर केली.

राज्यपालांची निवड किती चुकीच केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. मी इच्छा नसताना त्यावर जाहीरपणे बोललो आहे. राज्यपाल पदाची अप्रतिष्ठा कशी केली जाते त्याचे उदाहरण, आता ते इथे नाहीएत त्यामुळे जास्त बोलण्यात अर्थ नाही. राज्यपालांनी जे नुकसान करायचे ते करून गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नाव राहिल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या निकालानंतर केली. 

पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या निकालाची कॉपी वाचूनच त्यावर बोलणे योग्य होईल. त्यातील एक दोन मुद्दे पाहिले, त्यावर कोर्टाने जे आज राज्यकर्ते आहेत त्यांच्यासंबंधी तीव्र भूमिका कोर्टाने मांडली आहे. त्यात एक महत्वाचा निकाल दिसतोय, लेजिस्लेटिव्ह पार्टी ही फायनल नाहीय. ज्या राजकीय पक्षाच्या सूचनेवरून लोक निवडणूक लढवितात, निवडून येतात ती महत्वाची आहे, हे दिसतेय, असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात जे घडले ते आधीही घडले आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये हेच झालेय, असे पवार म्हणाले. 

काही निर्णय अद्याप यायचे आहेत. अध्यक्षांवर एक महत्वाचा निर्णय सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामधून अपात्रतेचा विषय एका विशिष्ट काळात निकाली लावावा अशी अपेक्षा कोर्टाची आहे. ज्यावेळेला अध्यक्ष याची भूमिका घेतील त्यावेळी आमचे म्हणणे मांडावे लागेल, असे पवार म्हणाले. 

अध्यक्ष हे एक संस्था आहेत, सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले आहे. त्याची जबाबदारी असलेल्यांनी त्याचे पावित्र्य जपायची खबरदारी घ्यायला हवी. या संस्थेची आस्था किती आहे ते उद्या काय भूमिका घेतात त्यावरून स्पष्ट होईल, असे पवार म्हणाले. ठाकरेंनी राजीनामा दिला होता यावर मी पुस्तकातही लिहिले आहे. मी म्हटलेय की नाराजी निर्माण झाली होती. ती नाराजीच नव्हती तर वस्तूस्थिती होती हे सर्वोच्च न्यायालयानेही आता स्पष्ट केले आहे. अध्यक्षांना अपात्रतेच्या नोटीशीवर निर्णय घेण्यास तारीख दिलेली नसली तरी लवकर करावे असे म्हटले आहे., असे पवार म्हणाले. सरन्यायाधीशांनी आज जे सांगितलेय ते ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला भाजपाकडून सत्तेचा गैरवापर कसा होतो हे सांगणे आमच्यासाठी सोपे झाले आहे, असेही पवार म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे