शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

शासकीय इमारती उजळणार सौरऊर्जेने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 02:44 IST

‘मेडा’कडून प्रक्रिया सुरू; राज्यात १० मेगावॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य

- राजानंद मोरे पुणे : राज्यभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या इमारतींमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. दररोज किमान १० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुढील वर्षभरात इमारतींवर प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे.केंद्र सरकारने मागील काही काही वर्षांपासून सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी देशभरात विविध योजना, प्रकल्प राबविले जात आहेत. याअंतर्गत शासकीय इमारतींच्या छताचा वापर करून सौरऊर्जेतून वीजनिर्मिती करण्यासाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यांना केंद्राकडून एकूण खर्चाच्या २५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्यात महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) मार्फत ही योजना राबविली जात असून योजनेची प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत खासगी पुरवठादारांमार्फत राज्यभरातील शासकीय इमारतींवर १० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. एका इमारतीवर किमान १० ते ५०० किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प असेल.राज्यातील शासकीय इमारतींमध्ये विविध विभागांची कार्यालये, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारती यांसह सर्व प्रकारच्या निमशासकीय विभागांच्या इमारतींचा समावेश असेल. याबाबतची निविदा प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होऊन पुरवठादारांची निवड केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.१ हजार वॅट म्हणजे १ युनिट वीजसाधारणपणे १०० वॅटचा बल्ब १० तास सुरू राहिला तर १ हजार वॅट म्हणजे एक युनिट वीज जळते. एक युनिट म्हणजे प्रतितास १ किलोवॅट विजेचा वापर होतो. तर १ किलोवॅट म्हणजे १ हजार वॅट. याचा अर्थ १० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दररोज १० हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे. प्रत्येक इमारतीवर किमान १० ते ५०० किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची योजना आहे. त्यामुळे शासकीय इमारतींमधील विद्युत उपकरणे आवश्यकतेनुसार चालविणे सहज शक्य होणार आहे.प्रतियुनिट कमी दराप्रमाणे पुरवठादारांची निवड होईल. त्यानंतर त्यांना शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागेल. तिथे सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी कार्यालय प्रमुखांची मान्यता घ्यावी लागेल. कार्यालयाच्या गरजेनुसार १० ते १०० मेगावॅटचे प्रकल्प इमारतीच्या छतावर उभारले जातील. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज संबंधित कार्यालयांना ‘मेडा’ने निश्चित केलेल्या दराप्रमाणे विकत घ्यावी लागेल. महावितरणकडून मिळणाऱ्या विजेच्या तुलनेत ही वीज खूप स्वस्त असणार आहे. पुढील २५ वर्षांपर्यंत संबंधित पुरवठादारावरच प्रकल्पाची जबाबदारी असेल.