शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

... त्यामुळे अजितदादांना २०१९ च्या निवडणुकीत पराभूत करणे आशावाद ठरेल : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 14:27 IST

बारामतीमध्ये विधानसभा जिंकणार असा दावा आपण कधीच केलेला नाही.यासंदर्भात छापुन आलेले वृत्त चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले.

ठळक मुद्दे२०२४ ची बारामती लोकसभा  निवडणुक हेच आमचे टार्गेट सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यास संपुर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचा कॉन्फिडन्स जातो

बारामती:  २०१९ ची बारामती विधानसभा हे भाजपचे टार्गेट नाही. २०२४ ची बारामती लोकसभा निवडणुक हे आमचे टार्गेट आहे.त्यासाठी दर आठवड्याला बारामतीमध्ये येणार आहे. अजितदादांनी या मतदार संघात केलेली एकुण विकासकामे पाहता २०१९ ला त्यांंना पराभूत करणे आशावाद ठरेल,अशी कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.बारामती येथील आयोजित दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप येथील लोकसंपर्क वाढविण्यावर भर देणार आहे.त्यासाठी दर आठवड्याला इथे येण्याचे ठरवले आहे. आज देखील बारामती तालुक्यातील प्रश्नांसाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे. येथील सर्वसामान्यांमध्ये भाजपबाबत विश्वास निर्माण करणार आहोत.बारामतीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. बारामतीमध्ये विधानसभा जिंकणार असा दावा आपण कधीच केलेला नाही.यासंदर्भात छापुन आलेले वृत्त चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले. मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी असल्याने हे मान्य करतो.पत्रकारांनी आतातरी हे करेक्ट छापावे  म्हणजे अजित पवारांना बरे वाटेल,असे सांगायला पाटील विसरले नाहीत .राज्यातील युतीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या निम्म्या जागांबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये घटकपक्ष,मित्रपक्षांच्या जागा वजा केल्यानंतरच्या निम्म्या जागा, वजा करण्यापुर्वीच्या जागा याबाबत दुमत आहे.काळाच्या ओघात याबाबत पर्याय निघेल.निम्म्या जागावाटपासह सत्तेतील समान भागीदारी ठरली आहे.याशिवाय आणखी झालेल्या निर्णयाबाबत त्या तिघांशिवाय कोणीही सांगु शकणार नसल्याचे पाटील म्हणाले.सरकारी अधिकाºयांवर  चिखल फेकण्याचा प्रकार चुकीचा आहे. याबाबत नारायण राणे यांनी देखील आपणास फोन केला होता. त्यांनी निलेश राणेंना समजावतो,प्रोजेक्ट वेळेत लावा, असे सांगितले आहे. लोकशाही मागार्ने प्रश्न सुटणे आवश्यक आहे.त्यासाठी लोकशाही मार्गाने  जाणेच अपेक्षित आहे. कायदा हातात घेणे योग्य नाहि. प्रश्न चचेर्ने सोडवुया,असे देखील राणे यांना  आपण सांगितल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यास संपुर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचा कॉन्फिडन्स जातो. मारहाणीची घटना राज्यातील कर्मचाऱ्यांचे मनोबल ढासळवणारी आहे.आवश्यक कारवाईचे पोलीस अधिक्षकांना सुचना देण्यात आल्या आहेत,असे पाटील यांनी सांगितले.————————————————

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा