शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

... त्यामुळे अजितदादांना २०१९ च्या निवडणुकीत पराभूत करणे आशावाद ठरेल : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 14:27 IST

बारामतीमध्ये विधानसभा जिंकणार असा दावा आपण कधीच केलेला नाही.यासंदर्भात छापुन आलेले वृत्त चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले.

ठळक मुद्दे२०२४ ची बारामती लोकसभा  निवडणुक हेच आमचे टार्गेट सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यास संपुर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचा कॉन्फिडन्स जातो

बारामती:  २०१९ ची बारामती विधानसभा हे भाजपचे टार्गेट नाही. २०२४ ची बारामती लोकसभा निवडणुक हे आमचे टार्गेट आहे.त्यासाठी दर आठवड्याला बारामतीमध्ये येणार आहे. अजितदादांनी या मतदार संघात केलेली एकुण विकासकामे पाहता २०१९ ला त्यांंना पराभूत करणे आशावाद ठरेल,अशी कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.बारामती येथील आयोजित दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप येथील लोकसंपर्क वाढविण्यावर भर देणार आहे.त्यासाठी दर आठवड्याला इथे येण्याचे ठरवले आहे. आज देखील बारामती तालुक्यातील प्रश्नांसाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे. येथील सर्वसामान्यांमध्ये भाजपबाबत विश्वास निर्माण करणार आहोत.बारामतीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. बारामतीमध्ये विधानसभा जिंकणार असा दावा आपण कधीच केलेला नाही.यासंदर्भात छापुन आलेले वृत्त चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले. मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी असल्याने हे मान्य करतो.पत्रकारांनी आतातरी हे करेक्ट छापावे  म्हणजे अजित पवारांना बरे वाटेल,असे सांगायला पाटील विसरले नाहीत .राज्यातील युतीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या निम्म्या जागांबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये घटकपक्ष,मित्रपक्षांच्या जागा वजा केल्यानंतरच्या निम्म्या जागा, वजा करण्यापुर्वीच्या जागा याबाबत दुमत आहे.काळाच्या ओघात याबाबत पर्याय निघेल.निम्म्या जागावाटपासह सत्तेतील समान भागीदारी ठरली आहे.याशिवाय आणखी झालेल्या निर्णयाबाबत त्या तिघांशिवाय कोणीही सांगु शकणार नसल्याचे पाटील म्हणाले.सरकारी अधिकाºयांवर  चिखल फेकण्याचा प्रकार चुकीचा आहे. याबाबत नारायण राणे यांनी देखील आपणास फोन केला होता. त्यांनी निलेश राणेंना समजावतो,प्रोजेक्ट वेळेत लावा, असे सांगितले आहे. लोकशाही मागार्ने प्रश्न सुटणे आवश्यक आहे.त्यासाठी लोकशाही मार्गाने  जाणेच अपेक्षित आहे. कायदा हातात घेणे योग्य नाहि. प्रश्न चचेर्ने सोडवुया,असे देखील राणे यांना  आपण सांगितल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यास संपुर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचा कॉन्फिडन्स जातो. मारहाणीची घटना राज्यातील कर्मचाऱ्यांचे मनोबल ढासळवणारी आहे.आवश्यक कारवाईचे पोलीस अधिक्षकांना सुचना देण्यात आल्या आहेत,असे पाटील यांनी सांगितले.————————————————

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा