...तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३ वा हप्ता, हे एक काम करणे अनिवार्य
By नितीन चौधरी | Updated: February 5, 2023 13:40 IST2023-02-05T13:40:29+5:302023-02-05T13:40:37+5:30
दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली सुरू करण्यात आली आहे.

...तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३ वा हप्ता, हे एक काम करणे अनिवार्य
पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दिला जाणारा दोन हजारांचा १३वा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. बँक खात्याला आधार न जोडलेल्या सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोस्ट, बँकेची मदत घेऊन १० फेब्रुवारीपर्यंत आधार जोडणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यात ९० कोटी वसूल करण्यात आले असून, अद्याप अकराशे कोटींची थकबाकी आहे.
- २० लाखांहून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यांच्याकडून अद्यापही १ हजार ९१ कोटींची थकबाकी
- १,०१,००० शेतकऱ्यांकडून ९० कोटी ३३ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
पैसे डिसेंबरमध्ये -
शेतकऱ्यांकडून ई-केवायसीसाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. या योजनेचा बारावा हप्ता ऑक्टोबरमध्ये देण्यात आला, तर १३वा हप्ता डिसेंबरमध्ये देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्र सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्याची अट घातली, तसेच प्राप्तिकर भरणारे, अधिकारी व कर्मचारी असणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.