शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:40 IST

देशात सध्या फसवाफसवी आणि बनवाबनवी सुरू आहे. सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत मोठी तफावत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली.

पुणे : ‘‘पंतप्रधानांनी स्वत:ला प्रधानसेवक, तर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सेवक म्हणून घ्यायला सुरुवात केली; मात्र त्यांच्या वागण्यात कोठेच सेवकांचा भाव दिसत नाही. याउलट, आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. देशात सध्या फसवाफसवी आणि बनवाबनवी सुरू आहे. सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत मोठी तफावत आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कारांचे पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, सभापती राणी शेळके, प्रवीण माने, सुजाता पवार, सुरेखा चौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात ‘बेटी बचाव व बेटी बढाव’ कार्यक्रमांतर्गत गुड्डा-गुड्डी फलकाचे अनावरण करण्यात आले.पवार म्हणाले, ‘‘गेल्या निवडणुकीच्या वेळेस अंगणवाडी सेविकांना किमान दररोज साडेतीनशे रुपये मानधन देऊ, अशी घोषणा भाजपाने दिली होती. आता सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली; मात्र या घोषणेचा सरकारला विसर पडला आहे. राज्यात २ लाख सेविका आहेत. त्यांना १८ हजार रुपये मानधन मिळालाय हवे. तेलंगणा, केरळमध्ये अंगणवाडी सेविकांना १० हजार, हरियाणामध्ये ८ हजार रुपये मानधन मिळते. मग, महाराष्ट्रात द्यायला काय हरकत आहे? मानधन वाढविणे सोडाच; पण आपल्या हक्काच्या मानधनासाठी संप पुकारणाºया सेविकांवर मेस्मा कायद्याचा बडगा उगारला. अवघ्या दीड हजाराची वाढ करून सेविकांची बोळवण सरकारने केली. राणी शेळके म्हणाले, ‘‘पोषण आहार निकृष्ट दर्जाचा मिळत आहे. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. यासाठी निधीची मोठी कमतरता आहे. याकडे प्राधान्याने लक्ष देऊन ही समस्या सोडविण्यात यावी.’’सूरज मांढरे म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत किंवा इतर ठिकाणी गेले असता नाइलाजास्तव कारवाई करावी लागते. तेथे नकारात्मक काम दिसते. मात्र, अंगणवाडीत गेल्यावर समाधान मिळते.’’ लवकरात लवकर १०० टक्के अंगणवाद्यांना नळ आणि वीज जोड दिला जाईल.’’ आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. दीपक चाटे यांनी आभार मानले.सरकारचे हे शेवटचे वर्ष आहे. जनता सुज्ञ आहे. यामुळे पुढच्या वर्षी परिस्थिती वेगळी असेल. अंगणवाडीसेविकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाला वाचा फोडणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सांगून विधान परिषदेत लक्षवेधीमध्ये सेविकांचे प्रश्न मांडण्यात येतील.’’- अजित पवार, मा. उपमुख्यमंत्री

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस