शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंच्या ट्वीटवर सिमी गरेवाल यांची कमेंट, म्हणाल्या, "लोकशाही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:58 PM

काल सत्तासंघर्षाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या होत्या.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सध्याचं महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा निकाल जाहीर झाला. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. तसंच उद्धव ठाकरेंनी गडबडीत राजीनामा द्यायची गरज नव्हती. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आज हे सरकार बेकायदेशीर ठरवलं असतं. या निर्णयानंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray)  ट्वीटवर अभिनेत्री सिमी गरेवालच्या (Simi Garewal) कमेंटने मात्र लक्ष वेधून घेतलं.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिले,"असंविधानिक, बेकायदा आणि अनैतिक. आजच्या निकालानंतर मिंधे भाजप सरकारकडे बघण्याचा हा एकच मार्ग आहे."

त्यांच्या या ट्वीटवर सिमी गरेवाल यांनी लिहिले,"काळजीचे कारण नाही. आता पुढे सगळं आमच्यावर महाराष्ट्राच्या जनतेवर अवलंबून आहे. हीच जनता मतदान करेल आणि अवैधरित्या प्रस्थापित झालेले सरकार पाडून लोकशाही पुन्हा अस्तित्वात आणेल."

सिमी गरेवाल यांच्या या कमेंटनंतर आदित्य ठाकरेंनीही त्यांचे आभार मानलेत. काल निर्णय जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या होत्या. तसंच न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले मात्र तरी सध्याचं सरकार कायदेशीर आहे असाच शेवटी निर्णय दिला.  

टॅग्स :Simi Garewalसिमी गरेवालAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdemocracyलोकशाही