शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

धक्कादायक; उन्हाच्या तीव्रतेमुळे राज्यात ६,५०० एकर तुतीचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 9:53 AM

टिकून राहिलेल्या क्षेत्रातील रेशीमकोषाला येतोय चांगला भाव; तुतीच्या क्षेत्रात सर्वाधिक फटका औरंगाबाद विभागाला

ठळक मुद्देयंदा राज्यात बारामती, जालना व पूर्णा (अमरावती) येथे रेशीमकोष खरेदी केंद्र सुरूकडक उन्हाळा, लांबलेला पाऊस, पावसाची संततधार व अनुदानाची तीन वर्षे संपल्याने क्षेत्र कमी झाल्याची कारणेतासगाव (सांगली) येथे रेशीमकोषासाठी दररोज दीड टन क्षमतेची स्वयंचलित रीलिंग मशीन पुढील महिन्यात सुरू होणार.

अरुण बारसकर 

सोलापूर : मागील वर्षीच्या दुष्काळाच्या तीव्रतेमुळे राज्यभरातील   ६ हजार ५०० एकर क्षेत्र घटले आहे, त्यात औरंगाबाद विभागातील चार हजार हेक्टरला फटका बसला होता. टिकून राहिलेल्या क्षेत्रातील रेशीमकोषाला चांगला दर मिळत असून, तो प्रति किलो ५०० रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात मागील काही वर्षांत तुतीच्या लागवडीवर शासनाने भर दिला आहे. रेशीमकोषाला स्थानिक बाजारापेठा निर्माण होण्यासाठीही राज्य शासनाने प्रयत्न केल्याने    तुतीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. तुती लागवडीचा मनरेगामध्ये समावेश केल्याने लागवडीपासून सलग तीन वर्षे दोन लाख ९५ हजार रुपये अनुदान स्वरूपात शेतकºयांना मिळतात. शिवाय कमी पाण्यावर येणारे हे पीक आहे. यामुळे प्रामुख्याने औरंगाबाद, अमरावती, नागपूर व पुणे विभागात मोठ्या प्रमाणावर तुतीची लागवड झाली होती.

तुतीचे क्षेत्र २३ हजार ५०० एकर इतके झाले होते. मात्र मागील वर्षी दुष्काळाची प्रचंड दाहकता असल्याने तुतीच्या क्षेत्रावर मोठी घट झाली आहे. राज्यातील जवळपास ६ हजार ५०० एकर क्षेत्र जळाले होते. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील चार हजार एकर, पुणे विभागातील एक हजार एकर, अमरावती विभागातील ११०० एकर तर नागपूर व अन्य एक अशा दोन जिल्ह्यांतील ४०० एकर क्षेत्र कमी झाले आहे. 

सध्या राज्यात १७ हजार एकर तुतीचे क्षेत्र असून, या टिकून राहिलेल्या क्षेत्रातील रेशीमकोषाला चांगला दर मिळत आहे. मागील वर्षी प्रतिकिलो ३०० ते ३५० रुपयांपर्यंत रेशीमकोषाची विक्री झाली होती. यावर्षी मात्र त्याच रेशीमकोषचा दर ४०० ते ५०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. चांगला पैसा मिळू लागल्याने शिवाय बाजारपेठही जवळच उपलब्ध झाल्याने शेतकºयांच्या हातात चार पैसे राहू लागले आहेत. 

बारामती, जालना व पूर्णा येथे रेशीमकोष खरेदी केंद्र

  • - यंदा राज्यात बारामती, जालना व पूर्णा (अमरावती) येथे रेशीमकोष खरेदी केंद्र सुरू
  • - कडक उन्हाळा, लांबलेला पाऊस, पावसाची संततधार व अनुदानाची तीन वर्षे संपल्याने क्षेत्र कमी झाल्याची कारणे
  • - औरंगाबाद जिल्ह्यात ९०० एकर, जालना ७५० एकर, लातूर ५५० एकर, उस्मानाबाद ६५० एकर, परभणी ३७५ एकर, हिंगोली, बीड, यवतमाळ व बुलडाणा प्रत्येकी ३०० एकर, नागपूर २०० एकर क्षेत्रातील तुतीचे क्षेत्र कमी झाले. 
  • - तासगाव (सांगली) येथे रेशीमकोषासाठी दररोज दीड टन क्षमतेची स्वयंचलित रीलिंग मशीन पुढील महिन्यात सुरू होणार.

मनरेगामधून प्रति एकरी दोन लाख ९५ हजार रुपये अनुदान मिळते. शिवाय ट्रेनिंगची सोय. यावर्षी पाच हजार एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट तर १० हजार शेतकºयांची नोंदणी अपेक्षित आहे.  महारेशीमचा फायदा शेतकºयांनी घ्यावा. मागील काही वर्षांत रेशीमकोषाचा दर कमी झालेला नाही. शिवाय राज्यातच कोष विक्रीची सोय केली.- अर्जुन गोरेउपसंचालक (रेशीम), नागपूर

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी