शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

धक्कादायक ! राज्यात मानवी तस्करीच्या होताहेत सर्वाधिक घटना; मुंबई आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 11:32 IST

जागतिक वेश्या व्यवसाय विरोधी दिन विशेष: वर्षभरात १ हजार महिलांची सुटका 

ठळक मुद्दे२०१९ मध्ये महाराष्ट्रात वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करीचे सर्वाधिक ६१४ गुन्हे दाखल

- विवेक भुसे- पुणे : वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी सर्वाधिक प्रमाणात होत असून देशभरात सर्वाधिक घटना महाराष्ट्रात नोंदविल्या जात आहे. देशभरात होणाऱ्या मानवी तस्करीच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा वाटा १२.८ टक्के इतका आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश (१० टक्के) आणि कर्नाटक (८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्रात १ हजार २० जणींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये ९४६ हून अधिक महिला, मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आले होते.सुटका करण्यात आलेल्या ९७८ महिलांपैकी ८७६ या देशाच्या विविध भागातील होत्या. तर ३१ बांगला देशी आणि ३१ इतर देशातील होत्या़ महाराष्ट्र पोलिसांनी ६५८ जणांना अटक केली होती. त्यापैकी ४०७ जणांविरुद्ध दोषारोपपत्र पाठविण्यात आले होते. परंतु, त्यापैकी केवळ एकाला शिक्षा लागली आहे. 

२०१९ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६१४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्या खालोखाल आसाममध्ये १७३, मध्य प्रदेश ११८, पश्चिम बंगाल ११५, केरळ १०८, कर्नाटक ९६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.महाराष्ट्रात प्रामुख्याने नेपाळ, बांगला देश, पश्चिम बंगाल या भागातून नोकरीच्या आमिषाने तरुणींना मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या शहरात आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. ही मानवी तस्करी रोखण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. असे असले तरी या व्यापारात गुंतलेल्यांची मोठी साखळी देशभर कार्यरत आहे. ती मोडून काढणे अजून शक्य झालेले नाही.देशातील मोठ्या शहरातील गुन्ह्यांच्या विचार करता मुंबईमध्ये सर्वाधिक ३११ मानवी तस्करीचे गुन्हे २०१९ मध्ये नोंदविण्यात आले होते. त्याखालोखाल दिल्ली (९७), बंगलुरु (८१), इंदौर (६७) पाठोपाठ पुणे (६५) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

टॅग्स :Puneपुणेsex crimeसेक्स गुन्हाProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसWomenमहिला