- विवेक भुसे- पुणे : वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी सर्वाधिक प्रमाणात होत असून देशभरात सर्वाधिक घटना महाराष्ट्रात नोंदविल्या जात आहे. देशभरात होणाऱ्या मानवी तस्करीच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा वाटा १२.८ टक्के इतका आहे. त्याखालोखाल आंध्र प्रदेश (१० टक्के) आणि कर्नाटक (८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्रात १ हजार २० जणींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये ९४६ हून अधिक महिला, मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आले होते.सुटका करण्यात आलेल्या ९७८ महिलांपैकी ८७६ या देशाच्या विविध भागातील होत्या. तर ३१ बांगला देशी आणि ३१ इतर देशातील होत्या़ महाराष्ट्र पोलिसांनी ६५८ जणांना अटक केली होती. त्यापैकी ४०७ जणांविरुद्ध दोषारोपपत्र पाठविण्यात आले होते. परंतु, त्यापैकी केवळ एकाला शिक्षा लागली आहे.
धक्कादायक ! राज्यात मानवी तस्करीच्या होताहेत सर्वाधिक घटना; मुंबई आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 11:32 IST
जागतिक वेश्या व्यवसाय विरोधी दिन विशेष: वर्षभरात १ हजार महिलांची सुटका
धक्कादायक ! राज्यात मानवी तस्करीच्या होताहेत सर्वाधिक घटना; मुंबई आघाडीवर
ठळक मुद्दे२०१९ मध्ये महाराष्ट्रात वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करीचे सर्वाधिक ६१४ गुन्हे दाखल