शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

वंचित आघाडी मविआसोबत न आल्याने फटका बसणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 15:11 IST

Lok Sabha Election 2024: वंचित आघाडी वेगळी लढण्याने मविआला फटका बसेल का, असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.

Uddhav Thackeray ( Marathi News ) : महाविकास आघाडीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली असून या पत्रकार परिषदेतून लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २१, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला १० आणि काँग्रेसला १७ जागा देण्यात आल्याचं यावेळी घोषित करण्यात आलं आहे. तसंच या तीन प्रमुख पक्षांसह माकप, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हेदेखील महाविकास आघाडीचे घटकपक्ष असतील, असं यावेळी मविआ नेत्यांनी सांगितलं. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास महाविकास आघाडीला अपयश आलं आहे. वंचित आघाडी वेगळी लढण्याने मविआला फटका बसेल का, असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल, त्यादृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले. मला आमच्यासोबत आलेल्या इतर छोट्या पक्षांना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण देशाचे संविधान वाचवण्यासाठी आम्ही जी ताकद उभी करतोय त्या ताकदीत या इतर पक्षांनी भर घातली. एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली. आम्हाला अशी अपेक्षा होती की प्रकाश आंबेडकर हेदेखील आमच्यासोबत येतील,  त्यांना काही जागा देऊ केल्या होत्या. मात्र दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही. आम्ही याआधीच आमची भूमिका स्पष्ट केलीय की, आंबेडकर यांनी आमच्यावर काहीही टीका केली तर आम्ही त्या टीकेला उत्तर देणार नाही. कारण त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आणि आदर होता, तो आदर आजही कायम आहे. संविधान रक्षणासाठी त्यांनी भूमिका घ्यावी, असं आमचं आजही मत आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे-पवारांना काय सल्ला दिला?

प्रकाश आंबेडकर यांनी कालच प्रसारमाध्यमांशी बोलताना मविआ नेत्यांवर निशाणा साधला. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातील बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील," असं आंबेडकर म्हणाले. तसंच "महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाला असून आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला," असंही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४