शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

वंचित आघाडी मविआसोबत न आल्याने फटका बसणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 15:11 IST

Lok Sabha Election 2024: वंचित आघाडी वेगळी लढण्याने मविआला फटका बसेल का, असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.

Uddhav Thackeray ( Marathi News ) : महाविकास आघाडीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली असून या पत्रकार परिषदेतून लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २१, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला १० आणि काँग्रेसला १७ जागा देण्यात आल्याचं यावेळी घोषित करण्यात आलं आहे. तसंच या तीन प्रमुख पक्षांसह माकप, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हेदेखील महाविकास आघाडीचे घटकपक्ष असतील, असं यावेळी मविआ नेत्यांनी सांगितलं. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास महाविकास आघाडीला अपयश आलं आहे. वंचित आघाडी वेगळी लढण्याने मविआला फटका बसेल का, असा प्रश्न यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल, त्यादृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले. मला आमच्यासोबत आलेल्या इतर छोट्या पक्षांना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण देशाचे संविधान वाचवण्यासाठी आम्ही जी ताकद उभी करतोय त्या ताकदीत या इतर पक्षांनी भर घातली. एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली. आम्हाला अशी अपेक्षा होती की प्रकाश आंबेडकर हेदेखील आमच्यासोबत येतील,  त्यांना काही जागा देऊ केल्या होत्या. मात्र दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही. आम्ही याआधीच आमची भूमिका स्पष्ट केलीय की, आंबेडकर यांनी आमच्यावर काहीही टीका केली तर आम्ही त्या टीकेला उत्तर देणार नाही. कारण त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आणि आदर होता, तो आदर आजही कायम आहे. संविधान रक्षणासाठी त्यांनी भूमिका घ्यावी, असं आमचं आजही मत आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे-पवारांना काय सल्ला दिला?

प्रकाश आंबेडकर यांनी कालच प्रसारमाध्यमांशी बोलताना मविआ नेत्यांवर निशाणा साधला. "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल केले नाही तर त्यांची इतर राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच वाताहत होणार आहे. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणातील बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील," असं आंबेडकर म्हणाले. तसंच "महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत न झाल्याने वंचितने प्रस्ताव फेटाळला. वंचित आणि महाविकास आघाडीचा मार्ग पूर्णपणे वेगळा झाला असून आता प्रचाराला सुरुवात झाल्याने महाविकास आघाडीचा विषय संपला," असंही आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४