शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

नारायण राणे म्हणजे किळसवाणी व्यक्ती: भास्कर जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 12:06 PM

कोकणचा विकास करायचे ते नेहमीच म्हणतात, मात्र दिल्लीत त्याचं कधीच तोंड उघडत नसल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.

मुंबई: शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीलासोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सतत टीका करणारे भाजपचे नेते नारायण राणेंचा शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तर नारायण राणे हे महाराष्ट्राला किळसवाणी व्यक्ती वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना जाधव म्हणाले की, नारायण राणेंच्या वक्तव्याला सद्या कुणीही कवडीची किंमत देत नाही. तर राणे यांचं राजकीय क्षेत्रातील महत्व संपले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचे योगदान नसल्याने त्यांना कुणीही मानत नाही. कोकणचा विकास करायचे ते नेहमीच म्हणतात, मात्र दिल्लीत त्याचं कधीच तोंड उघडत नसल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.

तसेच, मी खूप अभ्यासू,विचारवंत व मोठा वक्ता असल्याचे त्यांना वाटत असले तरीही चार वाक्य तरी राणेंना दिल्लीत बोलता येते का ? असा प्रश्न सुद्धा जाधवांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे दिल्ली आणि राज्याच्या राजकारणात राणेंना कोणतेही महत्व उरलेले नाही. आपली कुणीतरी दखल घ्यावी म्हणून त्यांची सतत बडबड सुरु असते. स्वता:च्या मुलाला निवडून आणण्याची पात्रता त्यांची राहिली नाही, त्यामुळे राणेंनी इतरांवर टीका करू नयेत, असा खोचक टोला सुद्धा आमदार जाधव यांनी राणेंना लगावला.

तर स्वता:चं अस्तीत्व टिकवून ठेवण्याचा राणेंचा केविलवाणी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नारायण राणे हे किळसवाणी व्यक्ती म्हणून महाराष्ट्राला वाटायला लागले आहेत. त्याचप्रमाणे नारायण राणेंचा पायगुण असा आहे की, ज्या पक्षात ते जातात त्याच्या पराभवचं होत असतो. त्यामुळे भाजपला सुद्धा आपला मुख्यमंत्री करता आले नाही. शिवसेना सोडताना जे आमदार राणेंनी सोबत नेले होते, त्यातील एकाला सुद्धा त्यांना निवडून आणता आले नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी जाधव यांनी केला.