शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

शिवसेना 'कन्फ्यूज'; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत वैचारिक गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 6:51 PM

भाजपासोबत सत्तेत राहायचं आणि त्यांना रोज झोडपायचं, हे शिवसेनेचं चमत्कारिक धोरण जसं अनाकलनीय आहे, तसंच इतरही काही विषयांबाबत शिवसेनेचा वैचारिक गोंधळ उडाला असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताज्या मॅरेथॉन मुलाखतीतून समोर आलं आहे.

मुंबई - भाजपासोबत सत्तेत राहायचं आणि त्यांना रोज झोडपायचं, हे शिवसेनेचं चमत्कारिक धोरण जसं अनाकलनीय आहे, तसंच इतरही काही विषयांबाबत शिवसेनेचा वैचारिक गोंधळ उडाला असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताज्या मॅरेथॉन मुलाखतीतून समोर आलं आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाबद्दल अत्यंत ठाम आणि जाज्ज्वल्य भूमिका होती. पण, उद्धव ठाकरे त्याबाबत संभ्रमात असल्याचं त्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमधून जाणवतं. त्याचप्रमाणे, काही धोरणं त्यांना पटत आहेत, पण केवळ मोदी सरकार ती राबवतंय म्हणून ते त्याला विरोध करताहेत, असंही प्रकर्षाने दिसतं. 

'कृष्णाने गीता सांगितली, पण ती अमलात आणली आपल्या शिवाजी महाराजांनी', या वाक्याने उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला सुरुवात झाली होती. त्यातून शिवाजी महाराजांबद्दलचा आदर जाणवत होताच, पण गीतामाहात्म्यही अधोरेखित होत होतं. भगवद्गीतेचंच सार सांगणारा 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्याच दिवशी हा पहिला भाग प्रसिद्ध झाला होता. टिळकांबद्दल ठाकरे कुटुंबाला किती अभिमान आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु, भगवद्गीता वाटपाच्या प्रश्नावर उद्धव यांनी अगदीच गुळमुळीत भूमिका घेतली. 

'हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून गीतेविषयी आदर राखायलाच हवा, पण देशात किंवा महाराष्ट्रात ज्या ‘कॉन्व्हेन्ट’ स्कूल्स आहेत तेथे गीता वाटणार आहात काय? भगवद्गीता वाचण्यापेक्षा तुम्ही शिक्षण व्यवस्था का सुधारत नाही? आधीच ज्या मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे आहे त्या ओझ्यामध्ये गीतेचे ओझे का टाकता?', असे प्रश्न उद्धव यांनी मुलाखतीत विचारले आहेत. जी भगवद्गीता शिवाजी महाराजांनी आचरणात आणली, त्या गीतेचा खरं तर हिंदुत्ववादी शिवसेनेनं आग्रह धरला पाहिजे. बाळासाहेबांनी कदाचित गीतावाटपाचं समर्थन केलं असलं, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. 

हिंदू सण आणि खास करून दही हंडी उत्सवासाठी शिवसेना अत्यंत आग्रही असते. शिवसेनेचे अनेक नेते आपापल्या भागात उंचच उंच हंड्याही उभारतात. पण, त्याच सेनेला श्रीकृष्णाची भगवद्गीता जड का वाटते?, असा प्रश्न काही सूज्ञ मंडळींनी केला आहे.

मी अयोध्येत जाऊन रामल्लाचे दर्शन घेणार आहे, वाराणसीत जाऊन गंगा आरतीत सहभागी व्हायचे आहे, असं सांगत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडलाय. पण, कृष्णाच्या भगवद्गीतेला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय.

'वन नेशन वन इलेक्शन' ही कल्पना चांगली आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत मांडलंय. म्हणजे, ती प्रत्यक्षात येणं देशासाठी फायद्याचं असल्याचं त्यांना वाटतंय. पण त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केल्यानं उद्धव यांनी त्यातही खोड काढल्याचं दिसतं. सर्वांना एकदा मूर्ख बनवण्याची संधी म्हणून ते 'वन नेशन'वाले इलेक्शन बघताहेत का?, असा सवाल त्यांनी केलाय. त्यामुळे दोन वाक्यांमध्ये विरोधाभास दिसतोय.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत