शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

स्वार्थासाठी लोकसभेला पळ काढला; शिवेंद्रसिंहराजेंचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 4:38 PM

अनेक वर्षे मंत्रीपदे भोगणारांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:घरी बसून नवख्यांना पराभवाच्या तोंडी का दिले, असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी जयंत पाटील यांना केला.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेले शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मंत्रीपदाच्या लालसेने शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती. त्याला शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रक काढून चोख प्रत्युत्तर दिले.

आपल्याला मंत्रीपदाचा हव्यास असता तर कधीच राष्ट्रवादी पक्ष सोडला असता, असा टोला शिवेंद्रसिंह राजेंनी लावला. मागील १५-२० वर्षे आपण राष्ट्रवादीत काम केले. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपली कधीही आठवण झाली नाही. परंतु, पक्ष सोडला की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझ्या नावाचा जप सुरू केला आहे. अनेक वर्षे मंत्रीपदे भोगणारांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:घरी बसून नवख्यांना पराभवाच्या तोंडी का दिले, असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी जयंत पाटील यांना केला.

यावेळी त्यांनी दिवंगत अभयसिंहराजे आणि शरद पवार यांच्या संबंधावर जयंत पाटील यांनी केलेल्या टिप्पणीचा समाचार घेतला. अभयसिंहराजे-शरद पवार यांचा उल्लेख करणारे जयंत पाटील हे भाऊसाहेब महाराजांना शेवटच्या पंचवार्षिक योजनेत मंत्रीपदापासून वंचित ठेवण्याचे राजकारण का झाले, याचं कारण सांगायचा विसरले. १५-२० वर्षे राष्ट्रवादी पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. प्रामाणिकपणाचे मला काय फळ मिळाले. पक्षात असताना माझी कुणालाही आठवण झाली नाही. राष्ट्रवादीत ४० वर्षे राहिलेली कुटुंब पक्ष सोडत आहेत. हे का घडतयं यावर जयंत पाटील यांनी बोलावे असंही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.