शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा वायदा शेतक-यांशी आहे - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 12, 2015 15:12 IST

शेतक-यांच्या जमिनीचा तुकडा त्यांच्या परवानगीशिवाय हिसकावून घ्यायचे पाप शिवसेना कदापि करणार नाही. कायदा तुमचा असला तरी आमचा वायदा शेतकर्‍यांशी आहे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - शेतक-यांच्या जमिनीचा तुकडा त्यांच्या परवानगीशिवाय हिसकावून घ्यायचे पाप शिवसेना कदापि करणार नाही. कायदा तुमचा असला तरी आमचा वायदा शेतकर्‍यांशी आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून भू-संपादन विधेयकविरोधी भूमिकेचे समर्थनच केले आहे.
लोकसभेत भू-संपादन विधेयक मंजूर होत असताना शिवसेनेचे खासदार मतदानात सहभागी न होता तटस्थ राहिले होते. या भूमिकेचे सामनातून समर्थन करण्यात आले आहे. 
शेतकरीविरोधातील कोणत्याही कायद्याचे समर्थन शिवसेना करणार नाही, हा आमचा शब्द होता व दिलेल्या शब्दास जागण्याची आमची परंपरा आहे. आमची बांधिलकी कष्टकर्‍यांशी आहे. शिवसेनेच्या खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही असेही लेखात नमूद करण्यात आले आहे. शेतकरीविरोधी विधेयकाबाबत शिवसेनेने सरकारविरोधी भूमिका घेऊन काय मिळवले? महाराष्ट्रात व दिल्लीत सरकारात सहभागी व्हायचे व सरकारी विधेयकांना विरोध करायचा हे कसे? पण शिवसेना ढोंग करीत नाही. शेतकर्‍यांकडे मते मागायची, त्यांना स्वप्ने दाखवायची, भरमसाट आश्‍वासने द्यायची व सत्ता येताच त्यांच्या जमिनीचा तुकडा त्यांच्या परवानगीशिवाय हिसकावून घ्यायचा. शेतकरी कर्जबाजारी असल्याने तो आत्महत्या करतो, त्यामुळे त्याचा सातबारा कोरा करा ही आमची मागणी आहे, पण त्याच्या शेतजमिनी काढून घेऊन सातबारा कायमचा कोरा करा, असा त्याचा अर्थ नाही, असे लेखात म्हटले आहे. शिवसेना उद्योग आणि विकासाची शत्रू नाही, पण शेतक-यांच्या रक्तातून मूठभर उद्योगपतींचे विकास मळे फुलणार असतील तर ते आम्ही कसे मान्य करणार असा सवालही लेखात विचारण्यात आला आहे.
सत्तेसाठी माती खाण्याचे काम शिवसेनेने केले नाही. आम्ही जे केले ते केले एका प्रामाणिक भावनेने केले. शेतकर्‍यांचे शाप घेऊन आम्हाला एक दिवसही सुखाने झोप घेता येणार नाही , असेही लेखात म्हटले आहे.