शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

शिवसेनेचे नागपुरात खातेच उघडणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 17, 2017 22:22 IST

नागपूर महानगरपालिका निवडणूकांच्या रिंगणात शिवसेनेसारखे जम नसलेले पक्षही उतरले आहेत.निवडणूकीत मत देणे विकासासाठी गुंतवणूक करणे असते. उद्धव-आदित्य ठाकरेंच्या पक्षाला

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 17 -  नागपूर महानगरपालिका निवडणूकांच्या रिंगणात शिवसेनेसारखे जम नसलेले पक्षही उतरले आहेत.निवडणूकीत मत देणे विकासासाठी गुंतवणूक करणे असते. उद्धव-आदित्य ठाकरेंच्या पक्षाला नागपुरात कुणी विचारत नाही. त्यांच्या पक्षरुपी बँकेचे नागपुरात खातेही उघडणार नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नागपुरात प्रथमच शिवसेनेवर टीका केली. शुक्रवारी सलग दुस-या दिवशी त्यांनी नागपुरातील विविध भागांत प्रचारसभा घेतल्या.
दक्षिण नागपुरातील मानवता हायस्कूल, छोटा ताजबाग चौक, नंदनवन तसेच बांग्लादेश परिसरात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांत खा.डॉ.विकास महात्मे, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 
गुंतवणूक करताना चांगल्या बँकेत केल्यास त्याचा परतावाही चांगला मिळतो. मतांच्या बाबतीतही हेच धोरण असायला हवे. भाजपारूपी बँकेत मतांची गुंतवणूक केल्यास ५ वर्षात ५ पट विकासाची १०० टक्के खात्री आहे. कॉंग्रेसमध्ये तर भांडणच सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मतांची गुंतवणूक केल्यानंतर तेथून मुद्दलदेखील परत मिळतत नाही.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही दिवाळखोर पक्ष असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजपाने सत्ता आल्यानंतरच खºया अर्थाने सामाजिक न्याय घडवून आणला आहे. कॉँग्रेसने इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी एवढ्या वर्षे सत्तेत असताना मोकळी करून दिली नाही. आम्ही इंदू मिलच्या जागेचा प्रश्न चुटकीसरशी सोडविला.  एवढेच नाही तर लंडन येथील बाबासाहेबांचे स्मारक, चैत्यभूमीचा विकास, दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र/पर्यटनाचा दर्जा, जपानमधील विद्यापीठात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे कार्य आम्ही केले आहे, असेदेखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाने नागपुरात केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचला. 
 
कॉंग्रेसचा सामाजिक न्याय ही ‘बोलाचीच कढी’
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसवरदेखील हल्लाबोल केला. भाषणातून सामाजिक न्यायाच्या बाता करणा-या काँग्रेसने सामाजिक न्याय आपल्या कृतीत कधीच उतरविला नाही. पक्षातील नेते आपापसाांत भांडणे करण्यात व एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहे. ज्यांना पक्ष सांभाळल्या जात नाही, ते काय नागरिकांचा विकास करणार, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.