शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे नागपुरात खातेच उघडणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 17, 2017 22:22 IST

नागपूर महानगरपालिका निवडणूकांच्या रिंगणात शिवसेनेसारखे जम नसलेले पक्षही उतरले आहेत.निवडणूकीत मत देणे विकासासाठी गुंतवणूक करणे असते. उद्धव-आदित्य ठाकरेंच्या पक्षाला

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 17 -  नागपूर महानगरपालिका निवडणूकांच्या रिंगणात शिवसेनेसारखे जम नसलेले पक्षही उतरले आहेत.निवडणूकीत मत देणे विकासासाठी गुंतवणूक करणे असते. उद्धव-आदित्य ठाकरेंच्या पक्षाला नागपुरात कुणी विचारत नाही. त्यांच्या पक्षरुपी बँकेचे नागपुरात खातेही उघडणार नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नागपुरात प्रथमच शिवसेनेवर टीका केली. शुक्रवारी सलग दुस-या दिवशी त्यांनी नागपुरातील विविध भागांत प्रचारसभा घेतल्या.
दक्षिण नागपुरातील मानवता हायस्कूल, छोटा ताजबाग चौक, नंदनवन तसेच बांग्लादेश परिसरात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांत खा.डॉ.विकास महात्मे, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 
गुंतवणूक करताना चांगल्या बँकेत केल्यास त्याचा परतावाही चांगला मिळतो. मतांच्या बाबतीतही हेच धोरण असायला हवे. भाजपारूपी बँकेत मतांची गुंतवणूक केल्यास ५ वर्षात ५ पट विकासाची १०० टक्के खात्री आहे. कॉंग्रेसमध्ये तर भांडणच सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मतांची गुंतवणूक केल्यानंतर तेथून मुद्दलदेखील परत मिळतत नाही.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही दिवाळखोर पक्ष असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजपाने सत्ता आल्यानंतरच खºया अर्थाने सामाजिक न्याय घडवून आणला आहे. कॉँग्रेसने इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी एवढ्या वर्षे सत्तेत असताना मोकळी करून दिली नाही. आम्ही इंदू मिलच्या जागेचा प्रश्न चुटकीसरशी सोडविला.  एवढेच नाही तर लंडन येथील बाबासाहेबांचे स्मारक, चैत्यभूमीचा विकास, दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र/पर्यटनाचा दर्जा, जपानमधील विद्यापीठात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे कार्य आम्ही केले आहे, असेदेखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाने नागपुरात केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचला. 
 
कॉंग्रेसचा सामाजिक न्याय ही ‘बोलाचीच कढी’
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसवरदेखील हल्लाबोल केला. भाषणातून सामाजिक न्यायाच्या बाता करणा-या काँग्रेसने सामाजिक न्याय आपल्या कृतीत कधीच उतरविला नाही. पक्षातील नेते आपापसाांत भांडणे करण्यात व एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहे. ज्यांना पक्ष सांभाळल्या जात नाही, ते काय नागरिकांचा विकास करणार, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.