'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:47 IST2025-07-30T19:45:59+5:302025-07-30T19:47:22+5:30

Sanjay Raut on Narendra Modi: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. 

Shiv Sena UBT MP Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi Over pahalgam attack | 'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "आपले पंतप्रधान आणि त्यांचे समर्थक स्वतःला देवाचे अवतार समजतात, असा घणाघात करत राऊतांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राऊत म्हणाले की, “या देशात उपराष्ट्रपती सरकारच्या आदेशाला न जुमानल्यास त्यांचा २४ तासांत राजीनामा घेतला जातो. मात्र, जेव्हा पहलगाम हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा सरकार कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही, ना कुणाकडून राजीनामा घेतला जातो, ना कुठली माफी मागितली जाते. पंतप्रधान म्हणतात की, कोणतीही घटना घडण्याआधीच त्यांना कुणकुण लागते, ही ईश्वराची कृपा आहे. मग पहलगाममधील हल्ल्याची कुणकुण त्यांना का लागली नाही?” असा परखड सवाल करत संजय राऊत यांनी थेट पंतप्रधानांनाच लक्ष्य केले.
 

Web Title: Shiv Sena UBT MP Sanjay Raut criticizes Prime Minister Narendra Modi Over pahalgam attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.