शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

समाजवादीच्या पाचपैकी तीन जागांवर मविआने उभे केले उमेदवार; अडचणीत सापडले अबू आझमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 14:46 IST

समाजवादी पक्षाने उमेदवार ठरवलेल्या पाच जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

Samajwadi Party : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी हळूहळू वाढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्वच पक्षांमध्ये जागा आणि उमेदवारांबाबत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीसोबत असलेल्या समाजवादी पक्षाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने महाराष्ट्रात समाजवादी पक्षाला सपशेल बाजूला केलं आहे.

जागावाटपाच्या बाबतीत, समाजवादी पक्षाने पाच जागांची मागणी केली होती. मात्र समाजवादीने दावा केलेल्या तीन जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसने उमेदवारांची घोषणा करुन टाकली आहे. तीन जागांवर शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता समाजवादी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी महाविकास आघाडीकडे महाराष्ट्रात पाच जागा देण्याची मागणी केली होती. मात्र अबू आझमी यांनी मागितलेल्या पाचपैकी तीन जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने २६ ऑक्टोबर रोजी त्यांचे उमेदवार जाहीर केले. अबू आझमी यांनी धुळे शहर, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम आणि मालेगाव मध्य जागा मागितल्या होत्या.

रईस शेख हे भिवंडी पूर्वेतील सपाचे आमदार आहेत. मात्र शनिवारी शिवसेनेने धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर केली. तर काँग्रेसने मालेगाव मध्यमधून एजाज बेग आणि भिवंडी पश्चिममधून दयानंद मोतीराम चोरघे यांना उमेदवारी जाहीर केली. तर मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून नवाब मलिक यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने आपल्याच जागेवर अबू आझमींच्या अडचणी वाढल्या आहेत.

यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्याविरोधात मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप त्यांना उमेदवारी जाहीर केली नसली तरी मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर लढण्याचा निर्धार केला आहे. तीन जागांवर मित्रपक्षांनी समाजवादी पक्षाला बाजूला करत उमेदवारी जाहीर केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने खेळलेल्या या खेळीमुळे अबू आझमी देखील चांगलेच अडचणीत सापडले आहेत. समाजवादी पक्षाने या जागांवर आपले उमेदवार आधीच जाहीर केले होते पण ठाकरे गट आणि काँग्रेसने जागावाटपात सपाला बाजूला केले. आता अबू आझमी यांनी पाच जागा न मिळाल्यास सर्व २५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAbu Azmiअबू आझमीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस