शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात”; शिंदे गटाच्या नेत्याचे कोणाबाबत विधान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 20:23 IST

Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का असेल, असा दावा शिंदेसेनेतील नेत्यांनी केला आहे.

Shiv Sena Shinde Group News: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण राबवले जाऊ शकते. ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसतच असून, राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा मोठे दावे केले आहेत.

उद्यापासून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडायला रत्नागिरीतून सुरुवात होत आहे. संजय राऊतांनी जे काही आरोप केले, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात रत्नागिरीतून प्रत्युत्तर देऊन करणार आहे. ठाकरे गटाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का असेल. संजय राऊत यांना नियती धडा शिकवेल, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 

ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात

बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत चांगली भूमिका मांडतील, त्यांचे समर्थन आम्ही करणार आहोत. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, ते माझ्या नावाचा वापर करत आहेत. असल्या बालिश पद्धतीने माझ्यात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणीही फूट पाडू शकत नाहीत. दावोसला असताना ज्या लोकांनी माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, माझा राजकीय अस्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले त्यांच्याबाबत मी एवढेच सांगू इच्छितो की, ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. वारंवार त्यांना फोन करत आहेत. कालही कॉल केला होता. आमचे आता पुढे राजकीय भवितव्य काय असेल, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले, असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला. 

दरम्यान, सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी उद्योगमंत्री झालो. दावोसला जाता आले. गेल्या दोन वर्षात आम्ही सुमारे ७ लाख कोटी रुपयांचे एमओयू करण्यात यशस्वी झालो. आज तीच प्रथा आम्ही कायम ठेवली. सुमारे १५ लाख ७० हजार कोटींचे MOU आम्ही महाराष्ट्रासाठी केले. उद्योगमंत्री म्हणून समाधानी आहे, असे उदय सामंत यांनी नमूद केले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस