शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: “अजिबात घाबरु नका, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी”; राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 11:52 AM

Rahul Gandhi Letter To Sanjay Raut: केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात संजय राऊतांच्या भूमिकेला राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील नेते आणि मंत्र्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुरू असलेल्या कारवाईवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत भाजपवर निशाणा साधताना दिसत आहेत. मंगळवारी पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी ही भाजपची एटीएम असल्याची टीका करत जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहिले असून, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी उभा असल्याचे म्हटले आहे. 

संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिले होते. या पत्राच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी संजय राऊतांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना ८ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राची दखल घेतली आहे. राहुल गांधी यांनी संजय राऊतांना काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. 

राहुल गांधी नेमके काय म्हणालेत पत्रात?

तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचा मी निषेध करत आहे. तुमच्या पत्रातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा झाला आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून कोणतीही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहोत, असे राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर हे पत्र शेअर केले असून, यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

आपल्याला एकत्र लढावे लागेल

संजय राऊत यांनी पत्राबाबत राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, ‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशीन झाली आहे, असा आरोप करत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील लवकरच तुरुंगात जातील. ईडी अधिकारी खंडणीतून वसूल होणारी रक्कम जितेंद्र नवलानीच्या सात कंपन्यांच्या खात्यांमध्ये जमा करत होते. या खंडणीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वसुली ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईत केली आहे. यासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. ईडी अधिकारी नक्कीच तुरुंगात जातील, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी