शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

शिवसेना-राष्ट्रवादीत संशयकल्लोळ; गृहखात्याची कारवाई; मुख्यमंत्री मात्र अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:31 AM

महाआघाडीत तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची समन्वय समिती बनविण्यात आली आहे. समितीने एकत्रित बसून एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांत कधीही डावललेला नाही, असे सांगून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, जर या प्रकरणातही अशा पद्धतीने तातडीने चर्चा झाली असती, तर आज सरकारला खुलासे करण्याची वेळ आली नसती.

अतुल कुलकर्णी -मुंबई : भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यासाठी रोखण्याच्या कारवाईवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय तणातणी सुरू झाली. या सर्व प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे तीन पक्षांचे सरकार असल्याने समन्वयाने आणि चर्चेने प्रश्न सोडविले पाहिजेत. परस्पर निर्णय होत असतील आणि त्याचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होत असेल तर हे अत्यंत धोकादायक आहे, अशी तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर, ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग केले की नाही माहिती नाही,’ असे म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी गृहविभागावर घेतली.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा विषय जेव्हा आला, तेव्हा सर्वांनी एकत्रितपणे चर्चा केली होती. शिवसेनेच्या एका नेत्याने स्पष्ट केले की, ज्या गोष्टींचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होऊ शकतो असे विषय मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याशी बोलूनच सोडविले गेले पाहिजेत. सोमय्या प्रकरणात तसे झाले नाही. परिणामी, विरोधकांना निष्कारण सरकारला बोल लावण्याची संधी मिळाली. मात्र राणे यांच्यावरील कारवाईची कसलीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नव्हती, असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. महाआघाडीत तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची समन्वय समिती बनविण्यात आली आहे. समितीने एकत्रित बसून एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांत कधीही डावललेला नाही, असे सांगून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, जर या प्रकरणातही अशा पद्धतीने तातडीने चर्चा झाली असती, तर आज सरकारला खुलासे करण्याची वेळ आली नसती. गणपती विसर्जन असल्यामुळे राज्यमंत्री सतेज पाटील हे कोल्हापुरातच होते. पण, त्यांना याची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. 

खुलासे करण्याची वेळजिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी निर्णय घेतले. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. आपले अधिकारी चुकले तरी शेवटी विभाग प्रमुख म्हणून ती जबाबदारी आपली आहे, असे म्हणत दिलीप वळसे-पाटील यांना अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीचे खुलासे करीत बसण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस