शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

Sanjay Raut छगन भुजबळांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दरवाजे बंद?; संजय राऊतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 12:30 IST

छगन भुजबळ यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश आणि एकनाथ शिंदेंसोबत पुन्हा जुळवून घेणार का अशा विविध मुद्द्यांवरून संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गटाची स्पष्ट भूमिका मांडली. 

मुंबई - Sanjay Raut on Chhagan Bhujbal ( Marathi News ) राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक वावड्या उठत आहेत. भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात असून लवकरच ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा आहे. त्यातच भुजबळ शिवसेना ठाकरे गट किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परततील असंही सांगितले जाते. मात्र छगन भुजबळ काँग्रेस, त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेत, हा त्यांचा मोठा प्रवास आहे. त्या प्रवासात शिवसेना खूप मागे राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासात शिवसेना पुढे आहे. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद नाही, चर्चा नाही आणि होण्याची शक्यता नाही असं मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची कालपासून अफवा आहे. परंतु ते कोणत्या वाटेने येत आहेत हे आम्हाला दिसलेले नाही. छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेत होते, त्याला एक कालखंड झाला आहे, आता त्यांनी स्वतःचा मार्ग निवडलेला आहे त्यांची एक वेगळी भूमिका आहे.  भुजबळांची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका आता मेळ खाणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या पेरून, अफवा पसरवून महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या गोंधळ उडवायचा असेल त्यापलीकडे अशा बातम्यांना आम्ही जास्त काय महत्त्व देत नाही असं त्यांनी सांगितलं. 

त्याशिवाय छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणीही भेटलेलं नाही, चर्चा झालेली नाही आणि होणार नाही. त्यांच्या मनातली खदखद ही त्यांच्या पक्षाची खदखद आहे. त्याच्याशी आमच्या शिवसेनेचा काय संबंध? त्यांनी त्यांची खदखद त्यांच्या पक्षांच्या नेत्यांपुढे त्यांचे नेते - आता अजित पवार आहेत, त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत, त्यांचे नेते प्रफुल पटेल आहेत त्यांच्यासमोर मांडली पाहिजे असा टोलाही संजय राऊतांनी छगन भुजबळांना लगावला. 

दरम्यान, अडीच वर्ष ज्यांनी शिवसेनेचा उभा दावा मांडला, शिवसेना फोडली. महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवला त्यांच्याशी आता कोणताही संबंध, संवाद राहिलेला नाही. राहणार नाही. गेली अडीच वर्षात शिवसेना त्यांच्याशिवाय पुढे गेली, हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसतेय. ९ खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मतांनी पडल्या हे खरं असलं तरी आम्ही नऊ जागा निवडून आणल्या अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी? असा सवाल करत संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचं म्हटलं. 

जे सोडून गेले, ते पुन्हा नको

आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली ती अशा बेईमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही. ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसांची गद्दारी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष कधी पुढे नेला नाही. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीने ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि उद्धव ठाकरे यांनी ती त्याही पुढे नेली असं राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे