शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

शिवसेना-भाजप स्थानिक पातळीवरही होतायत विभक्त ? औरंगाबादेतून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 13:05 IST

शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन मित्रपक्ष मिळाले आहे. त्यामुळे भाजपने साथ सोडली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता टिकवणे त्यांना अवघड जाणार नाही. तर विरोधात बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा एकदा सत्तेची फळं चाखता येणार आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणूक सोबत लढवून सत्तास्थापनेच्या वेळी विभक्त होणाऱ्या भाजप आणि शिवसेनेतील वितुष्ट आता चांगलेच वाढले आहे. त्यातच जनता प्रश्न विचारत असल्याचे सांगत स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत असलेल्या युत्या तोडण्याचा निर्णय भाजपने घेतला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. औरंगाबादेत भाजपने महापालिकेत शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेऊन याला सुरुवात केली आहे. भाजपने राज्यात आपला प्रतिस्पर्धी फक्त शिवसेनाच असं निश्चित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत युती करून लढलेल्या शिवसेना-भाजपला जनतेने बहुमत दिले होते. यामध्ये भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. त्यामुळे युतीचं सरकार येणार हे स्पष्ट होते. तसेच सर्व आमदारांनी जनतेला याच आधारावर मतं मागितली होती. मात्र भाजपने मुख्यमंत्रीपदासंदर्भात नरमाईची भूमिका न घेतल्याने युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ मिळवत सरकार स्थापन केले.

भाजपच्या स्थानिक पातळीवरील प्रतिनिधींना यामुळे अडचण होण्यास सुरुवात झाली आहे. जनता प्रश्न विचारत असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेसोबत असलेल्या युत्या तोडण्याच्या तयारीत भाजप दिसत आहे. याला औरंगाबादमध्ये सुरुवात तर झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. औरंगाबाद महानगर पालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत. भाजपचा उपमहापौर असून उपमहापौरांनी राजीनामा देत सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक जिल्हा परिषदा, नगर पालिका, महानगरपालिकेत उभय पक्ष एकत्र सत्तेत आहे. मात्र राज्यातील बदलेल्या समिकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप विभक्त होणार असं दिसत आहे.

दरम्यान शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन मित्रपक्ष मिळाले आहे. त्यामुळे भाजपने साथ सोडली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता टिकवणे त्यांना अवघड जाणार नाही. तर विरोधात बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा एकदा सत्तेची फळं चाखता येणार आहे.