शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

“आता तर लोकांची खात्री पटली आहे की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली!”; शिंदे गटाचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 14:39 IST

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी जरूर बारसूला जावे. लोकांना संघर्ष करायला लावायचे, अहित करायचे हे राज्याच्या संस्कृतीला धरून नाही, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली.

Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष शमताना दिसत नाही. दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता तर लोकांची खात्री पटली आहे की, राष्ट्रवादीनेच शिवसेना संपवली, असा दावा शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर आणि स्पष्ट भाष्य केले. 

आता तर लोकांची खात्री पटली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत आहेत. जर राज्यात बदल घडला नसता तर सगळी शिवसेना संपली असती, असा दावा दीपक केसरकर यांनी दिला. 

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत

सन २०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे तेच मुख्यमंत्री राहतील अशी अपेक्षा आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी जरूर बारसूला जावे. कारण त्यांनीच बारसू या ठिकाणी हा प्रकल्प व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. लोकांना संघर्ष करायला लावायचे, त्यांचे अहित करायचे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. जनतेने समजून घेतले पाहिजे की हा विरोध राजकीय आहे, असे दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्राचा विकास थांबण्याबाबत वज्रमूठ असण्याऐवजी महाराष्ट्राच्या विकासाचे योगदान जनतेला देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील दोन लाख तरुणांच्या नोकऱ्या काढून घेताना आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल? हे कुणी पाहत असेल तर हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, अशी टीकाही दीपक केसरकर यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेना