शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Vidhan Sabha 2019: 'उद्योगपतींना 85 हजार कोटी पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 11:34 IST

राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आत्महत्या करत आहे.

मुंबई - देशातील मोठ-मोठ्या उद्योगपतींनी बँकेचे थकवलेले पैसे भरणाऱ्या सरकारकडे कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात विधानसभा निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर  शरद पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, सत्ताधारी व विरोधकात आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहेत. सातारा येथे रविवारी झालेल्या सभेतून शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, देशातील मंदी, बेरोजगारी अशा अनेक मुद्यावरून त्यांनी भाजपवर टीका केली. तर चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असंही पवार म्हणाले.

मोठ-मोठ्या उद्योगपतींनी शासकीय-खाजगी बँकमधून घेतलेले कर्ज थकवल्याने बँकेंची परिस्थिती बिघडली म्हणून सरकारने त्या बँकेंची परिस्थिती सुधारण्यासाठी 85 हजार कोटी रुपये बँकांना दिले. कर्ज उद्योगपती घेतात आणि पैसे सरकार भरत आहे. मात्र त्याच सरकारकडे कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचा आरोप पवार यांनी केला. राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आत्महत्या करत आहे. असे असूनही हे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप सुद्धा पवार यांनी केला.

देशात मंदी आली असून, त्यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जात आहे. आधीच देशात बेरोजगारिचा प्रश्न असताना, त्यात आता आहे त्या नोकऱ्या जात आहे.  देशात अशी परिस्थिती असताना सुद्धा राज्यकर्त्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचा टोला पवार यांनी लगावला. पदवीधर तरुण नोकऱ्यांच्या शोधात फिरत असून त्यांना काम मिळत नाही. अनेक ठिकाणी चालू कारखाने बंद पडत असल्याचे सुद्धा यावेळी पवार म्हणाले.