शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

Vidhan Sabha 2019: 'उद्योगपतींना 85 हजार कोटी पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 11:34 IST

राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आत्महत्या करत आहे.

मुंबई - देशातील मोठ-मोठ्या उद्योगपतींनी बँकेचे थकवलेले पैसे भरणाऱ्या सरकारकडे कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात विधानसभा निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर  शरद पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, सत्ताधारी व विरोधकात आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहेत. सातारा येथे रविवारी झालेल्या सभेतून शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, देशातील मंदी, बेरोजगारी अशा अनेक मुद्यावरून त्यांनी भाजपवर टीका केली. तर चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असंही पवार म्हणाले.

मोठ-मोठ्या उद्योगपतींनी शासकीय-खाजगी बँकमधून घेतलेले कर्ज थकवल्याने बँकेंची परिस्थिती बिघडली म्हणून सरकारने त्या बँकेंची परिस्थिती सुधारण्यासाठी 85 हजार कोटी रुपये बँकांना दिले. कर्ज उद्योगपती घेतात आणि पैसे सरकार भरत आहे. मात्र त्याच सरकारकडे कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचा आरोप पवार यांनी केला. राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आत्महत्या करत आहे. असे असूनही हे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप सुद्धा पवार यांनी केला.

देशात मंदी आली असून, त्यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जात आहे. आधीच देशात बेरोजगारिचा प्रश्न असताना, त्यात आता आहे त्या नोकऱ्या जात आहे.  देशात अशी परिस्थिती असताना सुद्धा राज्यकर्त्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचा टोला पवार यांनी लगावला. पदवीधर तरुण नोकऱ्यांच्या शोधात फिरत असून त्यांना काम मिळत नाही. अनेक ठिकाणी चालू कारखाने बंद पडत असल्याचे सुद्धा यावेळी पवार म्हणाले.