शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Vidhan Sabha 2019: 'उद्योगपतींना 85 हजार कोटी पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 11:34 IST

राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आत्महत्या करत आहे.

मुंबई - देशातील मोठ-मोठ्या उद्योगपतींनी बँकेचे थकवलेले पैसे भरणाऱ्या सरकारकडे कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात विधानसभा निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर  शरद पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, सत्ताधारी व विरोधकात आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहेत. सातारा येथे रविवारी झालेल्या सभेतून शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, देशातील मंदी, बेरोजगारी अशा अनेक मुद्यावरून त्यांनी भाजपवर टीका केली. तर चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असंही पवार म्हणाले.

मोठ-मोठ्या उद्योगपतींनी शासकीय-खाजगी बँकमधून घेतलेले कर्ज थकवल्याने बँकेंची परिस्थिती बिघडली म्हणून सरकारने त्या बँकेंची परिस्थिती सुधारण्यासाठी 85 हजार कोटी रुपये बँकांना दिले. कर्ज उद्योगपती घेतात आणि पैसे सरकार भरत आहे. मात्र त्याच सरकारकडे कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचा आरोप पवार यांनी केला. राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी आत्महत्या करत आहे. असे असूनही हे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप सुद्धा पवार यांनी केला.

देशात मंदी आली असून, त्यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जात आहे. आधीच देशात बेरोजगारिचा प्रश्न असताना, त्यात आता आहे त्या नोकऱ्या जात आहे.  देशात अशी परिस्थिती असताना सुद्धा राज्यकर्त्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचा टोला पवार यांनी लगावला. पदवीधर तरुण नोकऱ्यांच्या शोधात फिरत असून त्यांना काम मिळत नाही. अनेक ठिकाणी चालू कारखाने बंद पडत असल्याचे सुद्धा यावेळी पवार म्हणाले.