शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती; उत्तम जानकर, रोहित पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 19:43 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी (दि.१) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदाबाबत निर्णय घेण्यात आला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत आमदार जितेंद्र आव्हाड, नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबादारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तर आमदार उत्तम जानकर आणि आमदार रोहित पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी (दि.१) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदाबाबत निर्णय घेण्यात आला. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली. त्यानुसार, नवनिर्वाचित आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली तर, ज्येष्ठ नेते, आमदार उत्तम जानकर आणि नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, विधिमंडळाचे नेते बैठकीला उपस्थित नसल्याने विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात आलेली नाही. हिवाळी अधिवेशनाच्या काळात या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. 

आज झालेल्या बैठकीत विधिमंडळातील १० पैकी ९ सदस्य उपस्थित होते. आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते. संदीप शिरसागर यांच्या मतदारसंघात त्यांच्या सत्कार कार्यक्रम असल्याने या बैठकीला अनुपस्थित राहण्याची त्यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, संदीप शिरसागर उद्या येऊन आज मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. तसेच, आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही लोकांचे प्रश्न मांडू. मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतदान कसे वाढले, याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली. फॉर्म १७ आणि मतांची आकडेवारी जुळत नसेल तर हे फार गंभीर आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा जिंकल्या आहेत. त्यात, तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील तर माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर विधानसभेत पोहोचले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला अपेक्षित यश आलं नसून केवळ ४९ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. त्यामध्ये, २० जागा जिंकून शिवसेना ठाकरे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसने १७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, महायुतीमधील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढे संख्याबळ नाही. मात्र, महाविकास आघाडीमधील पक्षांकडून विधिमंडळ गटनेते आणि प्रतोपदी पक्षातील नवनिर्वाचित आमदारांची नियुक्ती केली जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडRohit Patilरोहित पाटिलJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण