शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:31 IST

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापुरातील सणसर इथं आयोजित सभेत जयंत पाटलांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.

Jayant Patil ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यातील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केलेल्या टीकेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "नरेंद्र मोदी यांना ४ जूनला मतमोजणीनंतर लक्षात येईल की, पवार साहेब हे महाराष्ट्राचा आत्मा आहेत," असा पलटवार जयंत पाटलांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापुरातील सणसर इथं सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना जयंत पाटील म्हणाले की, "आता काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्या सभेत त्यांनी पवार साहेबांना आत्म्याची उपमा दिली. पण नरेंद्र मोदी यांना ४ जूनला मतमोजणीनंतर लक्षात येईल की, पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मा आहे. आदरणीय पवार साहेबांवर बोलण्याव्यतिरिक्त या पंतप्रधानांना काहीच जमत नाही. आपलं काम सांगायचं तर पंतप्रधान जाईल तिथे विरोधकांवर टीका करत आहेत. आम्ही अनेक पंतप्रधान पाहिले पण कोणत्याही पंतप्रधानाने विरोधकांवर अशी टीका केली नाही. हे नरेंद्र मोदी यांना शोभतंय असं वाटत नाही. ही निवडणूक खूप वेगळी आहे, सत्ताधाऱ्यांना काहीही करून ही निवडणूक जिंकायची आहे. म्हणून साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर होत आहे. त्यांच्या घौडदौडीला शरदचंद्र पवार साहेब लगाम लावत आहेत. म्हणून ते सतत पवार साहेबांवर टीका करत आहेत," अशा शब्दांत पाटील यांनी मोदींनी उत्तर दिलं.

"४०० पार करू असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदींच्या तोंडून आता ४०० हा शब्द देखील निघत नाही. कारण त्यांना कळून चुकले आहे की, त्यांच्या आता २०० वरही जागा येत नाही," असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला आहे.

अमित शाह यांच्यावरही निशाणा

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. "शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केले? हा प्रश्न महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी आम्हाला विचारू नये. त्यांनी गुजरातमध्ये काय केले हे सांगावे. देशातील जनता भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर इतकी नाराज आहे की, लोक भाजपच्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना गावात फिरू देत नाहीत," असं पाटील म्हणाले.

दरम्यान, "सुप्रिया सुळे यांना तुम्ही गेली १०-१५ वर्ष सतत निवडून देत आहात आणि त्या देखील तुमचे प्रश्न अत्यंत तळमळीने संसदेत मांडतात. प्रश्न संसदेत मांडले की सुटतात. त्याची नोंद घेतली जाते आणि प्रश्न सोडवणुकीस गती येते. आपला खासदार बोललाच पाहिजे. आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सुप्रियाताईंना निर्भीडपणे मतदान करा," असं आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थितांना केलं आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४