शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
3
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
4
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
5
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
6
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
7
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
8
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
9
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
10
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
11
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
12
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
13
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
14
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
15
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
16
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
17
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
18
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
19
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
20
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
Daily Top 2Weekly Top 5

३ दशकापूर्वीची 'ती' चूक शरद पवारांनी जाहिरपणे केली कबुल; पत्रकार परिषदेत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:14 IST

मराठा-ओबीसी आरक्षण वादात सरकारने सुसंवाद साधून चर्चेतून मार्ग काढावा अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. 

छत्रपती संभाजीनगर - आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाष्य करताना शरद पवारांनी सरकारला आंदोलकांशी संवाद ठेवण्याचा सल्ला दिला. त्यासोबतच ३ दशकापूर्वी मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाचा निर्णय घेताना केलेल्या चुकीची कबुली दिली. शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राज्यातील विविध मुद्दयांवर भाष्य केले. 

शरद पवार म्हणाले की, जेव्हा मी नामांतरणाचा निर्णय घेतला तेव्हा विधिमंडळ सदस्यांशी चर्चा करून त्याठिकाणी निर्णय घेतला त्याचे परिणाम मराठवाड्यात झाले. या परिणामाची किंमत काही गरीब लोकांना द्यावी लागली. त्यावेळी माझ्या लक्षात माझी चूक आली. हा निर्णय मी मुंबईत बसून घेतला, या निर्णयात ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी मी अजिबात संवाद साधला नाही. त्यानंतर मी स्वत: बाकीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच कॉलेजमध्ये मी स्वत: गेलो. विद्यार्थ्यांशी बोललो, सुसंवाद साधला. त्यानंतर वर्षभरानंतर ज्या निर्णयाला लोकांनी विरोध केला होता त्याला लोकांनी संमती आणि सहमती दाखवली. आज मराठवाड्यात काही ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा बाहेर आला आहे. यात नव्या पिढीची सुसंवाद साधायची आवश्यकता आहे. ते काम आम्ही नक्की करू असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठा आरक्षणासोबत लिंगायत, धनगर, मुस्लीम यांनासुद्धा आरक्षण द्यावं असं जरांगेंनी म्हटलं होतं. त्यांचे हे विधान समाजासमाजात जे अंतर झालं होतं ते पुन्हा योग्य रस्त्यावर येण्याची स्थिती झालेली आहे. सरकारने जो संवाद ठेवायला पाहिजे तो केली नाही. जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि त्यांचे लोक संवाद ठेवतात हे चांगले, परंतु दुसरे जे लोक आहेत त्यांना विरोध करणारे यांच्याशी सरकारमधील लोक संवाद ठेवतायेत हे कशासाठी, सरकार म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं. ओबीसींची चर्चा करताना भुजबळांना सांगायचे, जरांगेंशी स्वत: संवाद ठेवायचा. काहींना बाजूला ठेवायचा. त्यातून कारण नसताना गैरसमज होतात. परिस्थिती हवी तशी राहत नाही. सरकारने जरांगे, ओबीसी आरक्षणाचा आग्रह धरणारे हाके आणि त्यांचे सहकारी यांना बोलवा, आमच्यासारख्या लोकांची उपयुक्तता असेल तर आम्हाला बोलवा. सामुहिक चर्चा करून राज्यातील वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने अनुकूल राहील असा सल्ला शरद पवारांनी राज्य सरकारला दिला. 

दरम्यान, राज्य सरकार, राज्याचं नेतृत्व याने आरक्षणाच्या चर्चावर पुढाकार घ्यावा, इथला प्रश्न इथे आधी चर्चा व्हावी. प्रश्न दिल्लीत जाऊन त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे इथं चर्चेतून मार्ग काढावा अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. आरक्षणाबाबत मतभेद असण्याचं कारण नाही. काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यातून मला दुसऱ्या गोष्टीची काळजी आहे. दोन समाजात एकमेकांबद्दल अंतर वाढतेय का अशी स्थिती मला दिसते. विशेषत: मराठवाड्यातील २-३ जिल्ह्यात याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. अमुक समाजाच्या लोकाचं हॉटेल असेल तिथे दुसऱ्या समाजातील लोक जात नाही हे जर खरे असेल तर ते चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. उद्या संसदेचं अधिवेशन संपल्यावर या समाजात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत  असं सांगत शरद पवारांनी मराठा-ओबीसी आरक्षणावर भाष्य केले आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील