शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

सात महिलांनी केले पतीला किडनीदान!

By admin | Updated: March 15, 2015 02:18 IST

अवयवदानाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांना कळले असून, सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सात महिलांनी पतीला किडनीदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत़

अवयवदानाचे महत्त्व पटले : सातही दाम्पत्ये जगताहेत निरोगी आयुष्यनासीर कबीर - करमाळा (जि. सोलापूर)अवयवदानाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांना कळले असून, सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सात महिलांनी पतीला किडनीदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत़ किडनीसारखा महत्त्वाचा अवयव देताना रक्ताचे नातेही पुढे येत नाही़, तेथे या महिलांनी पतीला आपली किडनी दान करून वस्तुपाठ घालून दिला आहे़ करमाळा शहरातील अशोकलाल बोरा, संजयकुमार देवी, अशोक क्षीरसागर, दशरथ कणसे, अनिल कणसे, अजित मसलेकर व किरण सूर्यपुजारी या सात जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे किडनीचा आजार जडला होता. मानवी शरीराची प्रक्रिया निरंतर सुरू राहण्यासाठी प्रत्येक अवयव तसा महत्त्वाचाच असतो़ त्यातही किडनी तर मुख्य अवयव़ त्यालाच विकार जडला तर माणसाचा जीवच धोक्यात येतो़ पण तन आणि मनाने एकरूप झालेल्या जिवाला अर्ध्यावर कसे सोडणार, या विवंचनेतूनच या महिलांनी पतीला किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला व तो प्रत्यक्षात आणला़ पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये या सातही जणांवर किडनी रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली़ सातही दाम्पत्ये आज उत्तम व निरोगी आयुष्य जगत आहेत.आधुनिक सावित्री... संगीता अशोकलाल बोरा, सीमा संजयकुमार देवी, कमल दशरथ कणसे, सविता अनिल कणसे, स्वाती अजित मसलेकर, प्रतीक्षा किरण सूर्यपुजारी, प्रतीक्षा अशोक क्षीरसागऱस्त्रीच्या हृदयात माया, प्रेम, वात्सल्य व त्याग भरलेला आहे. जगाच्या पाठीवर आई, पत्नी, बहीण, मुलगी या नात्याची व्याख्या शब्दातीत आहे़ मला जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो़- अजित मसलेकर, रुग्णपती हाच परमेश्वर अशी धारणा मनात ठेवून किडनी दान केली़ यामुळे त्यांचे आयुष्य वाढले. मी स्वत:ला भाग्यवान व पुण्यवान समजते़- सविता कणसे