शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या गटनेतेपदाला ग्रहणच!

By admin | Updated: October 9, 2014 23:00 IST

पक्षीय कुरबूर : १९८५ पासूनचा इतिहास आजही कायम

रत्नागिरी : शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यात असलेली युती तोडून दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत. कोकणात शिवसेना सर्वाधिक रूजली असली तरी महाराष्ट्रातही आपले स्थान बळावले आहे. परंतु तेथेही पक्षांतर्गत कुरबुरी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येक कार्यकर्ता स्वत:चे अस्तित्व राखण्यात यशस्वी होत असताना सेनेच्या गटनेते पदाला मात्र ग्रहण लागलेले दिसून येत आहे. १९८५पासूनचा इतिहास पाहता सेना गटनेत्यांवर पक्षाबाहेर जाण्याची वेळ आली आहे.माझगाव (मुंबई) येथून सेनेच्या तिकिटावर १९८५ साली छगन भुजबळ निवडून आले होते. १९८६ साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू यांनी बालेकिल्ला जिंकला. मात्र, १९९0च्या निवडणुकीत रमेश प्रभू यांना सेनेने तिकीट नाकारल्यामुळे ते अपक्ष लढले. ८६च्या निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे सहा वर्षांसाठी कोर्टाने सेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार काढून घेतला होता. १९९०च्या निवडणुकीत डझनभर आमदारांसह भुजबळांनी बंडखोरी करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सेनाबळ घटल्याने विरोधी पक्ष नेते मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्याने गटनेतेपदी गणेश नाईक यांची निवड करण्यात आली होती. १९९५पर्यंत नाईक गटनेते पदी होते. १९९५मध्ये भाजप-सेनेला महाराष्ट्रात सत्ता मिळाली. परिणामी गणेश नाईक यांना पर्यावरणमंत्रीपद मिळाले. परंतु पक्षातील नेत्यांशी त्यांचे मतभेद असल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. १९९९मध्ये नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जानेवारी ते आॅक्टोबर १९९९ अखेर नारायण राणे मुख्यमंत्री होते. मात्र, १९९९ ते २००४ पर्यंत राणे विरोधीपक्ष नेते झाले. परंतु जुलै २00५मध्ये राणेंचे सेनेत मतभेद झाल्याने त्यांनी थेट काँग्रेस पक्षात उडी घेतली. त्यानंतर रामदास कदम यांची नियुक्ती विरोधी पक्षनेतेपदावर झाली. २००९ च्या निवडणुकीत खेड मतदारसंघाचे स्वतंत्र अस्तित्वच पुसले गेले. दापोली व गुहागर तालुक्यात विभागणी झाली. कदम गुहागरात निवडणूक लढवित असताना पराभूत झाले. सन २०१० मध्ये त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. मात्र, पराभवानंतर कदम मात्र फारसे सक्रीय दिसले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते लांबच राहिले. सन २००९ मध्ये सुभाष देसाई गटनेते झाले. भाजपशी वर्षानुवर्षे असलेली संगत तोडून सेना सध्या स्वबळावर निवडणूक लढवत आहे. कदम यांना मुंबई किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून उमेदवारी देणे सेनेला शक्य होते. मात्र, त्यांच्याबाबत सेनेने स्वारस्य नसल्याचे दाखवले आहे. शिवाय गतवर्षीच्या दसरा मेळाव्यातील मनोहर जोशींचा अपमानदेखील कार्यकर्त्यांनी पाहिला आहे. सुभाष देसाई यांचाही सेनेने पत्ता कापला आहे. एकूणच सेनेच्या गटनेतेपदालाच वावडे असल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षातील अंतर्गत धुसपूस किंवा नेत्यांमधील स्वार्थीपणा देखील गटनेतेपदी स्थिर राहिलेला नाही. शिवाय गटनेत्यांचा पक्षाने सन्मान केला असला तरी वेळ पाहून नसही कापली आहे, असे म्हणणे उचित ठरेल. (प्रतिनिधी) १९९०मध्ये रमेश प्रभू यांना सेनेने तिकीट नाकारल्याने अपक्ष लढले.१९९०च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी डझनभर आमदारांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश.१९९९मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेनेला केला जय महाराष्ट्र.२००५मध्ये नारायण राणेंचे सेनेत मतभेद झाल्याने काँग्रेस पक्षात घेतली उडी.आता वेळ रामदास कदमांची?