शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

सेनेच्या मंत्र्यांना काहीच किंमत नाही - राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 5:42 AM

नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळच्या बैठकीत काहीच बोलत नाहीत. प्रकल्पाची त्यांना माहिती नाही. सेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बिस्कीट खायला जातात का, असा सवाल करीत उद्योग मंत्र्यांना मंत्रिमंडळात काहीच किंमत नसल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

नागपूर : नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळच्या बैठकीत काहीच बोलत नाहीत. प्रकल्पाची त्यांना माहिती नाही. सेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बिस्कीट खायला जातात का, असा सवाल करीत उद्योग मंत्र्यांना मंत्रिमंडळात काहीच किंमत नसल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.गेल्या आठवड्याभरापासून नाणार प्रकल्पाचा मुद्दा गाजत आहे. सत्ताधारी भाजप या प्रकल्पासाठी आग्रही असून शिवसेनेसह विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी याला विरोध करीत आहे. या प्रकल्पावरून सातत्याने सभागृहाचे कामकाजही ठप्प पाडले जात आहे. सत्तेत असूनही शिवसेनेला आंदोलन करावे लागत आहे. त्यावर विरोधी पक्षांकडून चांगलीच टीका केली जात आहे. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी भाजप आणि शिवसेना दोघांवरही सडकून टीका केली. नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले निवेदन असमाधानकारक व दिशाभूल करणारे होते. नाणार प्रकल्पावर समन्वय आणि संवादाने मार्ग काढला जाईल, असे मुख्यमंत्री सांगतात. मात्र दुसरीकडे केंद्राच्या पातळीवर प्रकल्प पुढे नेण्यासंदर्भात करारही केले जातात.विखे पाटील यांनी शिवसेनेच्या दुतोंडी भूमिकेचाही चांगलाच समाचार घेतला. नाणार प्रकल्प रद्द करावा म्हणून शिवसेनेचे आमदार विधानसभेत गोंधळ करत असताना शिवसेनेचे मंत्री शासकीय कामकाजात सहभागी होतात. नाणार प्रकल्पाची भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याच्या प्रस्तावावर सही केली असून, मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी फाईल पाठविल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई सांगतात. उद्योग मंत्र्यांच्या सहीला काहीच किंमत राहिलेली नाही का, असा सवालही त्यांनी केला.शिवसेनेने आपली मर्दानगी दाखवावीनीतेश राणे यांनी सुद्धा नाणारवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे सांगत एकीकडे विरोध दुसरीकडे कामकाजात सहभाग असे का? गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेची नौटंकी आम्ही बघतो आहे. शिवसेनेला नाणार नकोच असेल तर सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होण्याची मर्दानगी दाखवावी, असा टोला त्यांनी लावला.सेनेची भूमिका मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावीनाणारवरून मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेनेची भूमिका मांडताना सुनील प्रभू म्हणाले की, स्थानिकांच्या विरोधात हा प्रकल्प लादला जाणार नाही. त्यामुळे त्यांनी ३१/१ ची अधिग्रहणाची नोटीस रद्द करावी. आम्ही मुख्यमंत्र्यांना गावकऱ्यांनी ग्रामसभेतून विरोधात केलेला प्रस्ताव सादर केला आहे. उद्योगमंत्र्यांनी अधिग्रहण रद्द करण्याची फाईल मुख्यमंत्र्याकडे पाठविली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची भूमिका लक्षात घेता, अधिग्रहणाची फाईल मंजूर करावी.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलnewsबातम्या