शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातही बहुतांश ग्रामपंचायतीत काँग्रेस विचाराचे उमेदवार विजयी- खा. अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 9:05 PM

मुंबई - दुस-या टप्प्यातील 3700 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

मुंबई - दुस-या टप्प्यातील 3700 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. पण सरकारचे अपयश लपविण्यासाठी खोटी आकडेवारी देऊन भाजपची फेकाफेकी सुरू आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आज निकाल जाहीर झालेल्या बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या 1063 आणि दुस-या टप्पा मिळून काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाच पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा भाजपाने या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. भाजपाकडून माध्यमांना पुरवण्यात आलेल्या आकडेवारीत भाजपाने अमरावती जिल्ह्यात 150 ग्रामपंचायतीत विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात भाजपाने फक्त 36 ग्रामपंचायतीत विजय मिळविला आहे, तर काँग्रेस पक्षाने 140 ग्रामपंचायतीत विजय मिळविला आहे.

आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 52 पैकी 27, अमरावती जिल्ह्यात 249 पैकी 140, सांगली जिल्ह्यातील 452 पैकी 139, पुणे जिल्ह्यातील 221 पैकी 77 ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात ही भाजचा दारुण पराभव झाला आहे. पण वस्तुस्थिती लपवण्यासाठी भाजपाकडून खोटी आकडेवारी दिली जात आहे. दुस-या टप्प्याच्या निकालाची सविस्तर आणि खरी आकडेवारी आम्ही लवकरच जाहीर करू असे सांगतानाच लोकांनी भाजपला दणका दिल्याने भाजपची फेकाफेकी सुरू आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.   

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस