शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
3
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
4
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
5
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
6
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
7
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
8
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
9
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
10
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
11
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
12
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
13
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
14
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
15
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
16
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
17
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
18
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
19
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
20
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचं वजन मोदींकडे, शिंदेंचं वजन शाह यांच्याकडे; संविधान बदलायला हरकत काय? संजय राऊतांचा सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:28 IST

...मग महाराष्ट्रातला जो बहुसंख्य मराठा समाज आहे, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय आहे?

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईत पोहचले आहेत. सध्या येथील आझाद मैदानावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांचे उपोषण सुरू आहे. याच मुद्द्यावर राज्यातील राजकारणही तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांवरही थेट निशाणा साधला. एवढेच नाही तर, यासाठी संविधान बदलायला काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, "केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. हा विषय (मराठा आरक्षण) केंद्राच्या अखत्यारीतला असेल, तर सरकारही आपलेच आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचेही दोन नेत्यांकडे वजन आहे. फडणवीसांचे वजन नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. तर शिंदेंचे वजन अमित शाह यांच्याकडे आहे. त्या दोन्ही नेत्यांचे मन वळवण्याचे काम आणि एक नवा कायादा तयार करण्याचे काम, या दोन नेत्यांनी करायला हवे. आम्ही बघतोय की आमचा हा मराठी माणूस पावसात भिजतोय, चिखलात बसलाय, हे चित्र महाराष्ट्रासाठी  बरे नाही."

यावेळी, फडणवीस म्हणतात की, आरक्षणावर संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील, केवळ आश्वासन देऊन काही होणार नाही, दोन समाज एकमेकांसोबत उभे राहू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न शील आहोत, असे विचारले असता राऊत म्हणाले, "पण राहिले आहेत ना. हे जे उभे राहणारे समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहेत, ते फडणवीसांचे चेले आहेत. ते फडणवीस सांगतील तसेच वागत आहेत. आणि या विषयावर संविधानाच्या गोष्टी फडणवीस यांनी आम्हाला सांगू नयेत." 

राऊत पुढे म्हणाले, "संविधानाच्या चौकटीत बसायला हवे, हे बरोबर आहे आणि संविधान बदलण्याचे काम सातत्याने... आणि आताही बदललेना संविधान आमदार खासदार आणि मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी.तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता. आपले जे राजकीय विरोधक आहेत, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, त्यांना गुन्हा दाखल केल्यावर तीस दिवसांत, पद सोडावे, अटक करावी, यासाठी आपण संविधान बदलू शकता... मग महाराष्ट्रातला जो बहुसंख्य मराठा समाज आहे, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला."

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणShiv Senaशिवसेना