शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

फडणवीसांचं वजन मोदींकडे, शिंदेंचं वजन शाह यांच्याकडे; संविधान बदलायला हरकत काय? संजय राऊतांचा सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:28 IST

...मग महाराष्ट्रातला जो बहुसंख्य मराठा समाज आहे, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय आहे?

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईत पोहचले आहेत. सध्या येथील आझाद मैदानावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांचे उपोषण सुरू आहे. याच मुद्द्यावर राज्यातील राजकारणही तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांवरही थेट निशाणा साधला. एवढेच नाही तर, यासाठी संविधान बदलायला काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, "केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. हा विषय (मराठा आरक्षण) केंद्राच्या अखत्यारीतला असेल, तर सरकारही आपलेच आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचेही दोन नेत्यांकडे वजन आहे. फडणवीसांचे वजन नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. तर शिंदेंचे वजन अमित शाह यांच्याकडे आहे. त्या दोन्ही नेत्यांचे मन वळवण्याचे काम आणि एक नवा कायादा तयार करण्याचे काम, या दोन नेत्यांनी करायला हवे. आम्ही बघतोय की आमचा हा मराठी माणूस पावसात भिजतोय, चिखलात बसलाय, हे चित्र महाराष्ट्रासाठी  बरे नाही."

यावेळी, फडणवीस म्हणतात की, आरक्षणावर संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील, केवळ आश्वासन देऊन काही होणार नाही, दोन समाज एकमेकांसोबत उभे राहू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न शील आहोत, असे विचारले असता राऊत म्हणाले, "पण राहिले आहेत ना. हे जे उभे राहणारे समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहेत, ते फडणवीसांचे चेले आहेत. ते फडणवीस सांगतील तसेच वागत आहेत. आणि या विषयावर संविधानाच्या गोष्टी फडणवीस यांनी आम्हाला सांगू नयेत." 

राऊत पुढे म्हणाले, "संविधानाच्या चौकटीत बसायला हवे, हे बरोबर आहे आणि संविधान बदलण्याचे काम सातत्याने... आणि आताही बदललेना संविधान आमदार खासदार आणि मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी.तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता. आपले जे राजकीय विरोधक आहेत, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, त्यांना गुन्हा दाखल केल्यावर तीस दिवसांत, पद सोडावे, अटक करावी, यासाठी आपण संविधान बदलू शकता... मग महाराष्ट्रातला जो बहुसंख्य मराठा समाज आहे, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला."

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणShiv Senaशिवसेना