शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांना चपलेने मारण्याची भाषा का केली? संजय राऊतांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 16:19 IST

राऊत म्हणाले, 'महाराष्ट्राचा बंगाल होणार नाही, राणेंच्या या विधानाचा अर्थ काय? तुम्ही बंगालमध्ये हरलात. जर तुम्ही हिच भाषा वापरत राहिलात तर महाराष्ट्रातही तुमची स्थिती अशीच असेल. 

 मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटकेनंतर जामीन मिळाला आहे. याच बरोबर आता त्यांना अटक केली जाणार नसल्याचेही महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, असे असतानाही हे प्रकरण अद्याप थांबलेले नाही. दोन्ही पक्षांकडून शाब्दिक द्वंद्व सुरूच आहे. यातच आता राणेंची भाषा अशीच राहिली तर महाराष्ट्रातही भाजपची स्थिती पश्चिम बंगालसारखीच होईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी, उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांबद्दल केलेल्या चप्पल मारण्यासारख्या वक्तव्यावरही भाष्य केले. (Sanjay Raut says Uddhav thackerays chappal remark on yogi over insult to chhatrapati shivaji maharaj)

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाबद्दलचे होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना चप्पल घालून हार घातला जात नाही. ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. हा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेला सन्मान आहे. 

महाराष्ट्र पोलीस उद्धव ठाकरेंवर FIR दाखल करणार? योगींबद्दच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेत्याची तक्रार

राऊत म्हणाले, 'महाराष्ट्राचा बंगाल होणार नाही, राणेंच्या या विधानाचा अर्थ काय? तुम्ही बंगालमध्ये हरलात. जर तुम्ही हिच भाषा वापरत राहिलात तर महाराष्ट्रातही तुमची स्थिती अशीच असेल. 

खात्याचं काम करा, शहाणपणा करू नका -संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. "तुम्हाला केंद्रीय मंत्री तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी केलं आहे. इथं महाराष्ट्रात येऊल बेताल वक्तव्य करण्यासाठी नव्हे. खात्याचे काम करा. जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आणि तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असाल तर ही शिवसेना आहे. हे आधी लक्षात घ्या", असा हल्लाबोलही राऊतांनी राणेंवर केला आहे.

...तर शिवसैनिकच नारायण राणेंचा एनकाऊंटर करतील; शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ 

योगींबद्दच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेत्याची तक्रार -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मुंबईतील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात केली आहे. याशिवाय महागाव, दिग्रस, पुसद येथील पोलीस ठाण्यातही भाजपाकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचेही समजते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाShiv Senaशिवसेना