शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांना चपलेने मारण्याची भाषा का केली? संजय राऊतांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 16:19 IST

राऊत म्हणाले, 'महाराष्ट्राचा बंगाल होणार नाही, राणेंच्या या विधानाचा अर्थ काय? तुम्ही बंगालमध्ये हरलात. जर तुम्ही हिच भाषा वापरत राहिलात तर महाराष्ट्रातही तुमची स्थिती अशीच असेल. 

 मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटकेनंतर जामीन मिळाला आहे. याच बरोबर आता त्यांना अटक केली जाणार नसल्याचेही महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, असे असतानाही हे प्रकरण अद्याप थांबलेले नाही. दोन्ही पक्षांकडून शाब्दिक द्वंद्व सुरूच आहे. यातच आता राणेंची भाषा अशीच राहिली तर महाराष्ट्रातही भाजपची स्थिती पश्चिम बंगालसारखीच होईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी, उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांबद्दल केलेल्या चप्पल मारण्यासारख्या वक्तव्यावरही भाष्य केले. (Sanjay Raut says Uddhav thackerays chappal remark on yogi over insult to chhatrapati shivaji maharaj)

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाबद्दलचे होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना चप्पल घालून हार घातला जात नाही. ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. हा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेला सन्मान आहे. 

महाराष्ट्र पोलीस उद्धव ठाकरेंवर FIR दाखल करणार? योगींबद्दच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेत्याची तक्रार

राऊत म्हणाले, 'महाराष्ट्राचा बंगाल होणार नाही, राणेंच्या या विधानाचा अर्थ काय? तुम्ही बंगालमध्ये हरलात. जर तुम्ही हिच भाषा वापरत राहिलात तर महाराष्ट्रातही तुमची स्थिती अशीच असेल. 

खात्याचं काम करा, शहाणपणा करू नका -संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. "तुम्हाला केंद्रीय मंत्री तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी केलं आहे. इथं महाराष्ट्रात येऊल बेताल वक्तव्य करण्यासाठी नव्हे. खात्याचे काम करा. जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आणि तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असाल तर ही शिवसेना आहे. हे आधी लक्षात घ्या", असा हल्लाबोलही राऊतांनी राणेंवर केला आहे.

...तर शिवसैनिकच नारायण राणेंचा एनकाऊंटर करतील; शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ 

योगींबद्दच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेत्याची तक्रार -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मुंबईतील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात केली आहे. याशिवाय महागाव, दिग्रस, पुसद येथील पोलीस ठाण्यातही भाजपाकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचेही समजते.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाShiv Senaशिवसेना