शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
2
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
3
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
4
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
5
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
6
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
7
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
8
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
10
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
12
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
13
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
14
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
15
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
16
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
17
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
18
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
19
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
20
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

“उद्धव ठाकरेही पंतप्रधानपदासाठी इच्छुक, आमचे बोलणे काँग्रेसवाल्यांना कळत नाही”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 18:11 IST

Sanjay Raut News: आमच्या पक्षनेत्याचे नाव घेत असू, तर त्यात चुकीचे काय आहे, यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे चेहरे आहेत. तर इंडिया आघाडीकडून अद्यापही पंतप्रधानपदासाठी चेहरा कोण, यावर एकमत होऊ शकलेले नाहीत. मध्यंतरी इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानपदासाठी अनेक नेते इच्छुक आहेत, त्यात उद्धव ठाकरेही आहेत, असे विधान केले.

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील राजकारणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०१९ मध्ये अडीच वर्षांनंतर दिल्लीत जाऊन काम करायचे होते, त्यांना अर्थ विभागात रस होता, हा उद्धव ठाकरेंनी केलेला दावा शंभर टक्के सत्य आहे. उद्धव ठाकरेंशी फडणवीसांची चर्चा झाली तेव्हा आमचे संबंध चांगले होते. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून, दिल्लीत जाऊन अर्थमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान होईल, असे देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न होते. स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच पाठिशी उभे राहतो. पण त्यांचे हे स्वप्न बहुधा मोदी आणि शाहांना आवडले नसावे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नांचे पंख कापण्यात आले. त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री करण्यात आले, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली. यावेळी पंतप्रधानपदाबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

आम्ही काय बोलतो, ते काँग्रेसवाल्यांना समजत नाही

पंतप्रधानपदासाठी वाद नाहीत. आम्ही काय बोलतो, ते काँग्रेसवाल्यांना समजत नाही. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत आणि ते जर पंतप्रधानपदासाठी इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागत आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी देशातील अन्य अनेक नेते इच्छुकांच्या रांगेत आहेत. ममता बॅनर्जी आहेत, अखिलेश यादव आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, उद्धव ठाकरे आहेत. यांच्यासह अनेक चेहरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. कोणाचे नाव घेणे गुन्हा आहे का, आमच्या पक्षनेत्याचे आम्ही नाव घेत असू, तर त्यात चुकीचे काय आहे, यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी ३०० हून अधिक जागा मिळवेल. त्यानंतर इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला जाईल. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याला सकारात्मक उत्तर दिले. इंडिया आघाडीत आणखीही नेते आहेत. इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. देशभरात राज्य पातळीवरही अनेक नेते आहेत. नेतृत्व कुणाचे असेल हा प्रश्न आमच्यासमोर नाही. आमची लढाई हुकूमशाहीविरोधात आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४