शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

"ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊत दिल्लीला राहुल गांधींना भेटले"; भाजपाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:00 IST

Raj Thackeray Uddhav Thackeray together , sanjay raut : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून संजय राऊतांनी आधी महायुतीवर टीका केली होती

महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं याचा प्रत्यय जनतेला गेल्या पाच ते सहा वर्षात सातत्याने येत आहे. सर्वप्रथम २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी युती करून महाविकास आघाडीचे सरकार आणले. त्यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत शिवसेना पक्ष वेगळा केला. २०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेत राष्ट्रवादी पक्ष वेगळा केला. तर काही दिवसांपूर्वीच तब्बल २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले आणि एकाच व्यासपीठावरून त्यांनी मराठीचा मुद्दा मांडला. राज्याच्या राजकारणात अशा विविध घटना घडत आहेत. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घडल्याचे भाजपचे मत आहे. याच दरम्यान भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे.

संजय राऊत-राहुल गांधी यांची दिल्लीत भेट

"उबाठाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना ज्याप्रमाणे देशातील कानाकोपऱ्यातून सूत्रांकडून विविध माहिती मिळत असते, तशीच माहिती आम्हालाही काही सूत्रांकडून मिळाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून मागच्या पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी राहुल गांधींची दोन तास भेट घेतली. आणि राहुल गांधींना विनंती केली की, तुम्ही या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करा आणि दोन भाऊ एकत्र येऊ नयेत यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. याचाच भाग म्हणून मुंबईत वरळी मध्ये झालेल्या मनोमिलनाच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी झाली नव्हती. तेव्हापासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वेगळा विचार करत आहे. आम्हाला मिळालेल्या सूत्रांची माहिती शंभर टक्के खरी आहे की दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून संजय राऊत यांनी पराकोटीचे प्रयत्न केले आहेत," असा दावा राम कुलकर्णी यांनी केला.

संजय राऊतांचा आरोप काय?

"शिंदे गटाचे पक्षप्रमुख दिल्लीत आहेत. त्यामुळे गुरूपोर्णिमेसाठी ते दिल्लीला जाणारच होते. गुरु म्हणून अमित शाहांच्या चरणावर डोके ठेवले, चाफ्याची फुले वाहिली. फोटो काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे स्वत:च ऑफर ठेवली. महाराष्ट्रात मराठी माणसांची एकजूट झाली आहे. ही एकजूट अधिकाधिक भक्कम होईल. त्याचा त्रास आम्हाला होईल. याकडे तुम्हाला लक्ष घालावे लागेल. मराठी माणसाची एकजूट तुटली नाही तर राजकीयदृष्ट्‍या आपल्याला फार मोठी अडचण होईल अशी चर्चा शाह-शिंदे यांच्यात झाली," असा दावा संजय राऊत यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा