शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

"ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊत दिल्लीला राहुल गांधींना भेटले"; भाजपाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:00 IST

Raj Thackeray Uddhav Thackeray together , sanjay raut : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून संजय राऊतांनी आधी महायुतीवर टीका केली होती

महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं याचा प्रत्यय जनतेला गेल्या पाच ते सहा वर्षात सातत्याने येत आहे. सर्वप्रथम २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी युती करून महाविकास आघाडीचे सरकार आणले. त्यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत शिवसेना पक्ष वेगळा केला. २०२३ मध्ये अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेत राष्ट्रवादी पक्ष वेगळा केला. तर काही दिवसांपूर्वीच तब्बल २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले आणि एकाच व्यासपीठावरून त्यांनी मराठीचा मुद्दा मांडला. राज्याच्या राजकारणात अशा विविध घटना घडत आहेत. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घडल्याचे भाजपचे मत आहे. याच दरम्यान भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे.

संजय राऊत-राहुल गांधी यांची दिल्लीत भेट

"उबाठाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना ज्याप्रमाणे देशातील कानाकोपऱ्यातून सूत्रांकडून विविध माहिती मिळत असते, तशीच माहिती आम्हालाही काही सूत्रांकडून मिळाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून मागच्या पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी राहुल गांधींची दोन तास भेट घेतली. आणि राहुल गांधींना विनंती केली की, तुम्ही या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करा आणि दोन भाऊ एकत्र येऊ नयेत यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. याचाच भाग म्हणून मुंबईत वरळी मध्ये झालेल्या मनोमिलनाच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी झाली नव्हती. तेव्हापासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वेगळा विचार करत आहे. आम्हाला मिळालेल्या सूत्रांची माहिती शंभर टक्के खरी आहे की दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून संजय राऊत यांनी पराकोटीचे प्रयत्न केले आहेत," असा दावा राम कुलकर्णी यांनी केला.

संजय राऊतांचा आरोप काय?

"शिंदे गटाचे पक्षप्रमुख दिल्लीत आहेत. त्यामुळे गुरूपोर्णिमेसाठी ते दिल्लीला जाणारच होते. गुरु म्हणून अमित शाहांच्या चरणावर डोके ठेवले, चाफ्याची फुले वाहिली. फोटो काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे स्वत:च ऑफर ठेवली. महाराष्ट्रात मराठी माणसांची एकजूट झाली आहे. ही एकजूट अधिकाधिक भक्कम होईल. त्याचा त्रास आम्हाला होईल. याकडे तुम्हाला लक्ष घालावे लागेल. मराठी माणसाची एकजूट तुटली नाही तर राजकीयदृष्ट्‍या आपल्याला फार मोठी अडचण होईल अशी चर्चा शाह-शिंदे यांच्यात झाली," असा दावा संजय राऊत यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा