शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 10:44 IST

महाविकास आघाडीनं निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला पाहिजे अशी भूमिका घेत संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केले आहे. 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सध्या तिन्ही पक्षात एकमत होताना दिसत नाही. उद्धव ठाकरेंकडे पाहून लोकांनी लोकसभेला मतदान केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा लागेल, चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर काँग्रेस राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं काम लोकांनी पाहिले आहे. लोकसभेला समाजातील अनेक घटकांचे मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहून झालेले आहे. तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी आणि बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाही. लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं विधान त्यांनी केले आहे. 

तर आम्ही आज एकत्रित आहोत, एकत्र राहणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री कोण यावर आम्ही चर्चा करत नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं सांगत उद्धव ठाकरेंच्या CM पदाच्या चेहऱ्यावर भाष्य करणं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टाळलं. 

दरम्यान, मुख्यमंत्री कोण व्हावा याच्यात मविआच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य ठेवले पाहिजे. मविआत निवडून आलेले आमदार कोण मुख्यमंत्री हे ठरवतील. महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षातील नेत्याने मुख्यमंत्री कोण होणार अशी भाषा करणे टाळले पाहिजे असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊतांना शिवसेनेचा टोला

संजय राऊत कधी काही बोलतील सांगता येत नाही. मागे निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केल्याचं आठवत असेल. आजच्या घडीला काँग्रेस दुसऱ्या चेहऱ्याला पुढे येऊ देणार नाही हे निश्चित आहे. उद्धव ठाकरेंचं नाव पुढे यावं ही राऊतांची मागणी त्यांच्या पक्षापुरती मर्यादित आहे. परंतु आघाडीत शरद पवार आणि इतर काँग्रेस नेते हे मान्य करतील असं वाटत नाही. म्हणून आघाडीत काडी लावण्याचा प्रकार संजय राऊतांनी सुरू केला आहे असा टोला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावला आहे.

तसेच जर उद्धव ठाकरेंकडे पाहून लोकांनी मतदान केले असा दावा संजय राऊतांचा असेल तर काँग्रेस १ वरून १३ वर जाते आणि तुम्ही १८ वरून ९ वर कसे येता? हा प्रश्न उपस्थित होतो. तुमचा स्ट्राईक रेट आणि संख्याबळ हे कुठेही वाढताना दिसत नाही. त्यामुळे आघाडीत पाहिले तर सर्वात पुढे काँग्रेस, २ नंबरवर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान झालं हे म्हणणं गैर आहे असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतJayant Patilजयंत पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातMahavikas Aghadiमहाविकास आघाडी