शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; अजित पवारांसह शिंदे गटाचाही घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:33 IST

ठाकरे शब्दांचे पक्के आहेत. सत्तेसाठी आम्ही खोटी आश्वासने देत नाही असं त्यांनी सांगितले.

मुंबई – उद्धव ठाकरेंनी सांगितले भाजपा खोटे बोलतंय. भाजपा वचनापासून मागे फिरली म्हणून राज्यात ही स्थिती निर्माण झालीय. आज उभा महाराष्ट्र हे पाहतोय. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी राजकारण केले हा आरोप जे करतायेत ते मातोश्रीच्या बैठकीतही उपस्थित नव्हते. छप्पन, अठ्ठावनकुळे जो आरोप करतायेत तो खोटा आहे. देवीच्या साक्षीने उद्धव ठाकरे जे बोलले ते सत्यच आहे. उद्धव ठाकरे खोटे बोलत नाहीत असं सांगत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, विदर्भात जो प्रतिसाद उद्धव ठाकरेंना मिळतोय तो राज्यातील जनता पाहतेय. अमरावतीत कार्यकर्त्यांची संवाद साधला. आज नागपूरला येतील. त्याठिकाणी विविध ठिकाणाहून कार्यकर्ते येतील. ठाकरे कुटुंबातील लोक सत्तेचे भूकेले नाहीत. ठाकरे कुटुंबाने नेहमी महाराष्ट्र आणि देशाला काहीतरी दिले आहे. पोहरादेवीची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. ठाकरे शब्दांचे पक्के आहेत. सत्तेसाठी आम्ही खोटी आश्वासने देत नाही असं त्यांनी सांगितले.

गुंडगिरी आम्हाला शिकवू नका, समोर या...

अमरावतीत उद्धव ठाकरेंचे बॅनर फाडले जातायेत. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण जो राष्ट्रवादीचा गट फुटलायत जे प्रखर हिंदुत्वाला विरोध करत होते त्यांच्यासमोर मुंबईत येऊन करावे. सत्ता आणि पोलीस पाठीशी असल्याने बॅनर फाडले जातायेत. ही गुंडगिरी त्यांनी आम्हाला शिकवू नये. अमरावतीत त्यांना पुन्हा निवडणुका लढवायच्या आहेत. या बाई पुन्हा लोकसभेत जातील असं वाटत नाही. कारण त्यांना बजरंगबली आणि हनुमानच धडाच शिकवणार आहे. हनुमानाच्या नावाने जी नौटंकी या लोकांनी केली त्यांना कर्नाटकात धडा मिळाला आहे. महाराष्ट्रातही मिळेल. रात्रीच्या अंधारातच पोस्टर्स फाडू शकतात. समोर या मग बघू असं आव्हान राऊतांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिले आहे.

शिंदे गट वैफल्यग्रस्त, अजित पवार बिनखात्याचे उपमुख्यमंत्री

विद्यमान ४ मंत्र्यांना काढून नवीन मंत्री घ्यावेत ही भाजपाची भूमिका आहे. मूळात महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अजित पवारांसोबतच्या ८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतु अजून खातेवाटप झाले नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासांत खातेवाटप करण्याची परंपरा आहे. परंतु अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ असे टोलेजंग भाजपामध्ये घेऊनसुद्धा ते ८ दिवस बिनखात्याचे म्हणून बसले आहेत. त्यावरून सरकारमध्ये किती गोंधळ आहे ते दिसते. अजित पवार सध्या बिनखात्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. भुजबळ, धनंजय मुंडे, मुश्रीफ हे बिनखात्याचे आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार खातेवाटप करू शकत नाही. कारण त्यांच्या सरकारमध्ये असंतोष आणि अराजकता आहे. दबावाची ताकद शिंदे गटात नाही. तेच हतबल, निराश आणि वैफल्यग्रस्त आहेत असं सांगत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे