शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; अजित पवारांसह शिंदे गटाचाही घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:33 IST

ठाकरे शब्दांचे पक्के आहेत. सत्तेसाठी आम्ही खोटी आश्वासने देत नाही असं त्यांनी सांगितले.

मुंबई – उद्धव ठाकरेंनी सांगितले भाजपा खोटे बोलतंय. भाजपा वचनापासून मागे फिरली म्हणून राज्यात ही स्थिती निर्माण झालीय. आज उभा महाराष्ट्र हे पाहतोय. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी राजकारण केले हा आरोप जे करतायेत ते मातोश्रीच्या बैठकीतही उपस्थित नव्हते. छप्पन, अठ्ठावनकुळे जो आरोप करतायेत तो खोटा आहे. देवीच्या साक्षीने उद्धव ठाकरे जे बोलले ते सत्यच आहे. उद्धव ठाकरे खोटे बोलत नाहीत असं सांगत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, विदर्भात जो प्रतिसाद उद्धव ठाकरेंना मिळतोय तो राज्यातील जनता पाहतेय. अमरावतीत कार्यकर्त्यांची संवाद साधला. आज नागपूरला येतील. त्याठिकाणी विविध ठिकाणाहून कार्यकर्ते येतील. ठाकरे कुटुंबातील लोक सत्तेचे भूकेले नाहीत. ठाकरे कुटुंबाने नेहमी महाराष्ट्र आणि देशाला काहीतरी दिले आहे. पोहरादेवीची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. ठाकरे शब्दांचे पक्के आहेत. सत्तेसाठी आम्ही खोटी आश्वासने देत नाही असं त्यांनी सांगितले.

गुंडगिरी आम्हाला शिकवू नका, समोर या...

अमरावतीत उद्धव ठाकरेंचे बॅनर फाडले जातायेत. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण जो राष्ट्रवादीचा गट फुटलायत जे प्रखर हिंदुत्वाला विरोध करत होते त्यांच्यासमोर मुंबईत येऊन करावे. सत्ता आणि पोलीस पाठीशी असल्याने बॅनर फाडले जातायेत. ही गुंडगिरी त्यांनी आम्हाला शिकवू नये. अमरावतीत त्यांना पुन्हा निवडणुका लढवायच्या आहेत. या बाई पुन्हा लोकसभेत जातील असं वाटत नाही. कारण त्यांना बजरंगबली आणि हनुमानच धडाच शिकवणार आहे. हनुमानाच्या नावाने जी नौटंकी या लोकांनी केली त्यांना कर्नाटकात धडा मिळाला आहे. महाराष्ट्रातही मिळेल. रात्रीच्या अंधारातच पोस्टर्स फाडू शकतात. समोर या मग बघू असं आव्हान राऊतांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिले आहे.

शिंदे गट वैफल्यग्रस्त, अजित पवार बिनखात्याचे उपमुख्यमंत्री

विद्यमान ४ मंत्र्यांना काढून नवीन मंत्री घ्यावेत ही भाजपाची भूमिका आहे. मूळात महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अजित पवारांसोबतच्या ८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतु अजून खातेवाटप झाले नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासांत खातेवाटप करण्याची परंपरा आहे. परंतु अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ असे टोलेजंग भाजपामध्ये घेऊनसुद्धा ते ८ दिवस बिनखात्याचे म्हणून बसले आहेत. त्यावरून सरकारमध्ये किती गोंधळ आहे ते दिसते. अजित पवार सध्या बिनखात्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. भुजबळ, धनंजय मुंडे, मुश्रीफ हे बिनखात्याचे आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार खातेवाटप करू शकत नाही. कारण त्यांच्या सरकारमध्ये असंतोष आणि अराजकता आहे. दबावाची ताकद शिंदे गटात नाही. तेच हतबल, निराश आणि वैफल्यग्रस्त आहेत असं सांगत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे