शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा 'डेंजरस' प्लॅन! भारताने ज्या विमानाला धूळ चारली, तेच आता 'या' देशाला विकणार?
2
मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला
3
विराट रोहितला म्हणाला- तो बघ माझा ड्युप्लिकेट बसलाय...; 'छोटा चिकू'ने सांगितली आठवण (VIDEO)
4
नवऱ्यासाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी, त्यानेच केला विश्वासघात; गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ
5
गुगलला माहितीये तुमचं प्रत्येक सिक्रेट; खासगी आयुष्य जपायचं असेल, तर आजच बदला 'या' ३ सेटिंग्स
6
"मला हवं, ते करेन...!" ट्रम्प यांच्या निर्णयावरून चीन भडकला, AI व्हिडिओ जारी करत उडवली खिल्ली
7
Chinese Manja: चिनी मांजा वापरणाऱ्यांची आता खैर नाही! ५ वर्षांच्या तुरुंगवासासह दंडाची तरतूद
8
महिलांना ३ हजार, मेट्रो-रो-रो सेवा, ५० वर्षांची पाण्याची सोय; हितेंद्र ठाकूरांचा जाहीरनामा
9
वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय?
10
सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोच, उपाशी पोटी पिण्याची सवय बदला; आरोग्यासाठी ठरेल घातक
11
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिली भाजपाच्या मुख्यालयाला भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
12
America Iran Tariff: अमेरिकेचा इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना इशारा, २५ टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा; भारतावर होणार 'हा' परिणाम
13
सैराट! प्रेमाला विरोध, पोटच्या लेकीचं कुंकू पुसलं; घरात घुसून जावयावर झाडल्या गोळ्या, परिसर हादरला
14
७६८ पट सबस्क्राईब झालेला 'हा' IPO; पण बाजारात एन्ट्री घेताच लोअर सर्किट, ₹८४ वर आला शेअर
15
ये क्या हो रहा है! दिशा पाटनी आता कोणाला करतेय डेट? पंजाबी गायकासोबत व्हिडीओ व्हायरल
16
Video - गुगल मॅप्सने दिला धोका, रात्री रस्ता चुकली परदेशी महिला; रॅपिडो ड्रायव्हर बनली देवदूत
17
मकर संक्रांती २०२६: सुगड पूजनाशिवाय संक्रांत अपूर्ण! वाचा साहित्य, शास्त्रोक्त विधी आणि शुभ मुहूर्त
18
"मुस्तफिजूर रहमानशी माझा काय संबंध?"; IPL 2026 वरच्या प्रश्नावर मोहम्मद नबी संतापला...
19
Makar Sankranti 2026: यंदा संक्रांतीला काळे कपडे घालणार? थांबा! 'या' ३ चुका केल्यास होऊ शकतो उलट परिणाम! 
20
आईच्या पिंडदानाची तयारी सुरू होती, तेवढ्यात फोन खणखणला अन्...; असं काही घडलं की सगळेच झाले हैराण!
Daily Top 2Weekly Top 5

“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:09 IST

Sanjay Raut News: प्रियंका चतुर्वेदी यांच्या सहभागाविषयी मला काही माहिती नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी कुणी बोलले असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केले आहे, संपलेले नाही, असेही भारताने स्पष्ट केले आहे. भारतातील खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील देशांमध्ये जाण्यासाठी रवाना होत असून, भारताची बाजू भक्कमपणे जागतिक मंचावर मांडली जाणार आहे. यावरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जागतिक स्तरावर काही प्रमुख देश नक्कीच महत्वाचे आहेत. सगळ्यात आधी तुम्ही शेजारच्या राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवायला पाहिजे. चीन, श्रीलंका, म्यानमार, तुर्कस्थानलाही शिष्टमंडळ पाठवयला पाहिजे. पाठवले का? अशी विचारणा करत, चीन, तुर्कस्थानलाही सांगायला हवे की, पाकिस्तानला मदत करून तुम्ही चूक करीत आहात. नेपाळ सारखे राष्ट्र आपल्या शेजारी आहे. जे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाते. तिथेही शिष्टमंडळ पाठवले पाहिजे. तुम्ही त्या देशात जाऊन आधी पाकिस्तानचा मुखवटा फाडायला हवा, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. 

शिष्टमंडळातील प्रतिनिधी निवडताना आम्हाला विचारले नाही

या सरकारने शिष्टमंडळावर ज्यांना पाठवायचे आहे, त्यांची निवड करताना त्या पक्षाच्या प्रमुखांशी सुरुवातीला चर्चा केली नाही. जर आमच्याकडे, आमच्या पक्षप्रमुखांकडे किंवा इतर पक्षाच्या प्रमुखांकडे त्यांनी ज्येष्ठ, अनुभवी सदस्यांची नावे मागितीली असती तर त्यांना आम्ही अधिक चांगल्या प्रकारे नक्कीच सहकार्य केले असते. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या युसूफ पठाणचा भाजपाने परस्पर शिष्टमंडळात सहभाग करून घेतला. हे अत्यंत चुकीचे आहे. ममता बॅनर्जी यांनी किरण रिजिजू आणि त्यांच्या यंत्रणेला जाब विचारला तुम्ही कोण आमचा सदस्य ठरवणारे? ममता बॅनर्जी यांनी अधिक अनुभवी असलेले अभिषेक बॅनर्जी यांना त्या शिष्टमंडळात सामील केले. हे जवळ जवळ प्रत्येक पक्षात झाले, असे संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी २०० देशात फिरले पण काही उपयोग झाला नाही. प्रत्येक देशात एस. जयशंकर जाऊन आले, तरी उपयोग झाला नाही. याचा अर्थ सरकार पूर्णपणे अपयशी आहे. म्हणून तुम्हाला ही कसरत करावी लागत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा एका शिष्टमंडळातील सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यावर बोलताना, मला त्यांच्याविषयी माहिती नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी कुणी बोलले असेल. सुरुवातीला आमच्याकडून कुणाचेही नाव नव्हते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतCentral Governmentकेंद्र सरकारOperation Sindoorऑपरेशन सिंदूर