शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

"आता त्यांनी ठरवायचं आहे की..."; खा. संजय राऊतांचा राज ठाकरेंना पुन्हा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 17:44 IST

तृणमूल काँग्रेस भाजपाचा पराभव करण्यास सक्षम आहे. त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली नसली तरी त्या इंडिया आघाडीच्या आजही घटक आहेत असा दावा संजय राऊतांनी केला. 

मुंबई - महाराष्ट्राची लूट करणाऱ्यासोबत जायचं, मुंबई वेगळी करणाऱ्यांसोबत जायचं की महाराष्ट्र, मुंबई एकसंघ ठेवणाऱ्यासोबत राहायचे हे राज ठाकरेंनी ठरवायला हवे. आज महाविकास आघाडीची बैठक संपली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर बैठकीत सहभागी होते. अनेक गोष्टींवर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. आम्ही मविआमध्ये वंचितचा समावेश केला असून प्रकाश आंबेडकरांकडून आलेली सूचना त्यावर नक्कीच चर्चा होईल असं संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. 

संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, बैठकीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, आम्ही आणि वंचित बहुजन आघाडीत कुठलेही मतभेद नाही. किमान समान कार्यक्रम तयार करतील त्याबाबत आंबेडकरांच्या काही सूचना आहेत. त्याचा समावेश आमच्या जाहिरनाम्यात केला जाईल. इंडिया आघाडी देशात काम करतेय. काही निर्णय हे धोरणात्मक आणि रणनीतीदृष्ट्या आहेत. आप काँग्रेसची दिल्लीत युती होतेय. तृणमूल काँग्रेस भाजपाचा पराभव करण्यास सक्षम आहे. त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली नसली तरी त्या इंडिया आघाडीच्या आजही घटक आहेत असा दावा संजय राऊतांनी केला. 

तसेच देशात संविधानविरोधी जे वातावरण निर्माण केलंय ते संपवायचे आहे. प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्ष भाजपाला मदत होईल अशी कुठलीही पाऊले उचलायची नाही. यावर आमचे एकमत झाले आहे. महाराष्ट्रातील राजकारण ज्यापद्धतीने गटांगळ्या खातंय आणि देशात हुकुमशाही सुरू आहे ते वातावरण बदलण्यासाठी आम्हाला एकत्रित राहणे गरजेचे आहे. जागावाटपावर सध्या सुरू आहे. भाजपाचा पराभव याला प्राधान्य आहे. त्यानंतर जागावाटप होईल असं विधान महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊतांनी केले. 

दरम्यान, या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनीही माध्यमांशी संवाद साधला होता. माझा चेहरा नेहमी हसराच असतो, मी दु:खी होत नाही. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. मविआच्या बैठकीत आम्ही काही मुद्दे ठेवले होते त्यावर तिन्ही पक्ष एकत्रित चर्चा करतील. त्यात काही त्रुटी असतील तर दूर करून त्यानंतर मसुदा तयार केला जाईल. महाविकास आघाडीचं इंडिया होऊ नये ही दक्षता घ्यायचे आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे जागावाटप हा आमचा पुढच्या टप्प्यातील चर्चा राहणार आहे. पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रम यावर चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडी आता राहिले नाही. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसही वेगळे राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तसं होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी म्हटलं होते. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा