शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 08:34 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना लक्ष्य केले. त्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे. 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांच्या हालचाली सुरू झाल्यात. मनसेनेही विधानसभेची तयारी सुरू केलीय. नुकतेच उद्धव ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंब्यावरून राज ठाकरेंची खिल्ली उडवली त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात शाब्दिक संघर्ष दिसून येत आहे. मनसेवर कधीही न बोलणारे उद्धव आणि आदित्य ठाकरे हे आता मनसेवर बोलतायेत. कारण त्यांच्या मनात भीती आहे असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. 

एका मुलाखतीत संदीप देशपांडे म्हणाले की,  जसजसं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकत आहे तसं ते मनसेवर बोलायला लागलेत. याआधी ते आमच्यावर बोलायला तयार नव्हते. आज लोकांचा प्रतिसाद आणि राज ठाकरेंना मिळणारा पाठिंबा यामुळे त्यांना भीती वाटतेय. लोकसभा निवडणुकीत मराठी माणसांची मते त्यांना मोठ्या प्रमाणात पडली नाहीत. त्यामुळे त्याची भीतीही त्यांच्या मनात बसली आहे असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय केवळ वरळीच नाही तर इतर विधानसभा मतदारसंघातही मनसेची तयारी सुरू आहे. वरळी त्यातील एक आहे. मागील काही दिवसांत अनेक बैठका घेण्यात आल्यात. कार्यकर्त्यांना सक्रीय केले जात आहे. आम्ही लोकांशी बोलतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय. वरळीत जे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आहेत, ते ५ वर्ष लोकांशी बोलले नाहीत. त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही. लोकांना याचं दु:ख आहे. ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिले, ते आमदार भेटत नाहीत, संपर्कात राहत नाही त्यामुळे ते नाराज आहेत असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

दरम्यान, आम्हाला २००-२२५ जागांवर लढण्याची तयारी ठेवा, असा आदेश राजसाहेबांनी दिलाय. त्यामुळे त्या त्या मतदारसंघात मनसेची तयारी सुरू झाली आहे. पुढील काळात काय होईल हे सांगता येत नाही. अद्याप युतीबाबत कुठलीही बोलणी नाही. जो काही निर्णय असेल ते राज ठाकरे घेतील. मागील २ विधानसभा निवडणुकीत मनसेचा परफॉर्म्स चांगला नसला तरी मतांमध्ये आमच्या वाढ झालीय. २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मनसेला अधिक मते मिळाली आहेत. कोरोना काळात मनसेनं जे काम केलं, महाराष्ट्रात राजकारणाची खिचडी झालीय त्यामुळे लोकांमध्ये इतर पक्षांबद्दल राग आहे. त्यात मनसेकडे पर्याय म्हणून लोक बघतायेत असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला. 

...तर मी लढेन आणि जिंकेनही

अमित ठाकरे प्रत्येक ठिकाणी बैठका घेत आहेत. त्यात वरळी मतदारसंघ हा एक भाग आहे. ते वरळीतून निवडणूक लढतील असं काही नाही. जो योग्य उमेदवार असेल त्याला तिकीट दिलं जाईल. मला उमेदवारी मिळाली तर पूर्ण ताकदीने मी वरळीतून उभा राहीन आणि जिंकेन असा विश्वास देशपांडेंनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेAaditya Thackerayआदित्य ठाकरेvidhan sabhaविधानसभा