शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 08:34 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना लक्ष्य केले. त्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे. 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांच्या हालचाली सुरू झाल्यात. मनसेनेही विधानसभेची तयारी सुरू केलीय. नुकतेच उद्धव ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंब्यावरून राज ठाकरेंची खिल्ली उडवली त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात शाब्दिक संघर्ष दिसून येत आहे. मनसेवर कधीही न बोलणारे उद्धव आणि आदित्य ठाकरे हे आता मनसेवर बोलतायेत. कारण त्यांच्या मनात भीती आहे असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. 

एका मुलाखतीत संदीप देशपांडे म्हणाले की,  जसजसं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकत आहे तसं ते मनसेवर बोलायला लागलेत. याआधी ते आमच्यावर बोलायला तयार नव्हते. आज लोकांचा प्रतिसाद आणि राज ठाकरेंना मिळणारा पाठिंबा यामुळे त्यांना भीती वाटतेय. लोकसभा निवडणुकीत मराठी माणसांची मते त्यांना मोठ्या प्रमाणात पडली नाहीत. त्यामुळे त्याची भीतीही त्यांच्या मनात बसली आहे असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय केवळ वरळीच नाही तर इतर विधानसभा मतदारसंघातही मनसेची तयारी सुरू आहे. वरळी त्यातील एक आहे. मागील काही दिवसांत अनेक बैठका घेण्यात आल्यात. कार्यकर्त्यांना सक्रीय केले जात आहे. आम्ही लोकांशी बोलतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय. वरळीत जे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आहेत, ते ५ वर्ष लोकांशी बोलले नाहीत. त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही. लोकांना याचं दु:ख आहे. ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिले, ते आमदार भेटत नाहीत, संपर्कात राहत नाही त्यामुळे ते नाराज आहेत असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

दरम्यान, आम्हाला २००-२२५ जागांवर लढण्याची तयारी ठेवा, असा आदेश राजसाहेबांनी दिलाय. त्यामुळे त्या त्या मतदारसंघात मनसेची तयारी सुरू झाली आहे. पुढील काळात काय होईल हे सांगता येत नाही. अद्याप युतीबाबत कुठलीही बोलणी नाही. जो काही निर्णय असेल ते राज ठाकरे घेतील. मागील २ विधानसभा निवडणुकीत मनसेचा परफॉर्म्स चांगला नसला तरी मतांमध्ये आमच्या वाढ झालीय. २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मनसेला अधिक मते मिळाली आहेत. कोरोना काळात मनसेनं जे काम केलं, महाराष्ट्रात राजकारणाची खिचडी झालीय त्यामुळे लोकांमध्ये इतर पक्षांबद्दल राग आहे. त्यात मनसेकडे पर्याय म्हणून लोक बघतायेत असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला. 

...तर मी लढेन आणि जिंकेनही

अमित ठाकरे प्रत्येक ठिकाणी बैठका घेत आहेत. त्यात वरळी मतदारसंघ हा एक भाग आहे. ते वरळीतून निवडणूक लढतील असं काही नाही. जो योग्य उमेदवार असेल त्याला तिकीट दिलं जाईल. मला उमेदवारी मिळाली तर पूर्ण ताकदीने मी वरळीतून उभा राहीन आणि जिंकेन असा विश्वास देशपांडेंनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेAaditya Thackerayआदित्य ठाकरेvidhan sabhaविधानसभा