शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Video : मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचे विदारक वास्तव; आडातून पाणी शेंदतात हलगराचे ग्रामस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 19:00 IST

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भीषण पाणी टंचाई

औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील हलगरा हे गाव मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले असूनही या गावातील १० हजार लोकांना टँकरच्या एक घागर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. इतकेच नव्हे, तारेवरची कसरत करीत आडातून पाणी शेंदून घ्यावे लागते.  

निलंगा तालुक्यातील हलगरा या गावात तेरणा नदीवरून कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना सात वर्षांपासून बंद आहे. सद्यस्थितीत गावात ३६ मिनी वॉटर योजना सुरु केल्या, पण या योजनांपैकी केवळ केवळ दोन मिनी टाक्या सुरू आहेत. २१ विंधन विहिरीपैकी एक चालू असून २० बंद पडल्या आहेत. ११ हातपंप बंद असून आठ जुने पुरातन काळातील बांधकाम केलेले आड बंदच आहेत. पाण्याचे सर्वच स्रोत बंद पडल्याने एका टँकरद्वारे तीन आडामध्ये तीन दिवसाला एकदा पाणी सोडले जाते. पाणी आडात पडताच महिला, मुले आणि अबालवृद्धांची एकच धावपळ होते. घागर दोरीने शेंदून पाणी घेण्यासाठी आडावर एकच झुंबड उडते. टँकरमधून पडत असलेले पाणी घागरीत शेंदून घेण्यासाठी लगबग सुरू होते. सदर पाणी टंचाई लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात चार बोअर, विहीर अधिग्रहण व एका टँकरची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली होती. त्यातील दोन अधिग्रहणाचे स्रोत आटले असून एका टँकरद्वारे पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आणखी एका टँकरची व अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून त्यास मान्यता मिळाली नसल्याचे उपसरपंच अमृत बसुदे यांनी सांगितले. 

हलगरा या गावात जलयुक्त शिवार व गावकºयांच्या श्रमदानातून चांगले काम झाले होते. याची दखल घेत २०१७ मध्ये मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी गावात भेट देऊन श्रमदान केले व गाव दत्तक घेतले होते. तेव्हापासून आजतागायत त्यांनी या गावास भेटही दिलेली नाही. यावर्षी भीषण दुष्काळ पडला. या भागातून वाहणाºया तेरणा, मांजरा नद्या आटल्या आहेत. गावाजवळील शिरसी तळे आटले आहे. पाणी टंचाई तीव्र झाली. मात्र उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ग्रामस्थ पाणी टंचाईचे चटके निमूटपणे सहन करीत आहेत.  

आडात शेकडो घागरींची गर्दी...गावाची तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून तीन आडात टँकरचे पाणी दोन दिवसाला एकदा सोडले जाते. पाणी आडात पडण्याअगोदरच शेकडो रिकाम्या घागरी आडात दोरीच्या साह्याने पाणी पडण्याची वाट पाहात भर उन्हात थांबतात. घरातील कर्ता पुरुष, महिला, आजी, मुले, मुली हातात कळशी, घागर घेऊन धावत सुटतात. जीव मुठीत घेऊन या आडावर पाणी भरले जात आहे.

 

पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाकडे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही लक्षच दिले नाही. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके यांनी सोमवारी येथे भेट देत ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनास भाग पाडू, असे आश्वासन दिले. हलगरा गावात तातडीने टँकर पाठविण्यासाठी तसेच अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना फोनवरून सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, सुधाकर पाटील, किशोर लंगोट, देवदत्त पाटील, मंगेश चव्हाण, भरत पाटील, समीद्दीन देशमुख, सुधीर मसलगे, सुरेश रोळे, दत्ता भिडे, आशीतोष मसलगे, संतोष गंगठडे, दत्ता जोशी, नंदकुमार जोशी आदी उपस्थित होते. 

दुसऱ्या टँकरसाठी प्रस्ताव...हलगरा गावात पाणी टंचाई तीव्र झाली आहे. चार विंधन विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत. त्यापैकी दोन बंद पडल्या. एका टँकरने आडात पाणी टाकले जात आहे. दुसºया टँकरच्या मागणीसाठी १० दिवसांपूर्वी प्रस्ताव दिला असल्याचे ग्रामसेवक निखिल माळी यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई