शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Video : मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचे विदारक वास्तव; आडातून पाणी शेंदतात हलगराचे ग्रामस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 19:00 IST

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भीषण पाणी टंचाई

औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील हलगरा हे गाव मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले असूनही या गावातील १० हजार लोकांना टँकरच्या एक घागर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. इतकेच नव्हे, तारेवरची कसरत करीत आडातून पाणी शेंदून घ्यावे लागते.  

निलंगा तालुक्यातील हलगरा या गावात तेरणा नदीवरून कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना सात वर्षांपासून बंद आहे. सद्यस्थितीत गावात ३६ मिनी वॉटर योजना सुरु केल्या, पण या योजनांपैकी केवळ केवळ दोन मिनी टाक्या सुरू आहेत. २१ विंधन विहिरीपैकी एक चालू असून २० बंद पडल्या आहेत. ११ हातपंप बंद असून आठ जुने पुरातन काळातील बांधकाम केलेले आड बंदच आहेत. पाण्याचे सर्वच स्रोत बंद पडल्याने एका टँकरद्वारे तीन आडामध्ये तीन दिवसाला एकदा पाणी सोडले जाते. पाणी आडात पडताच महिला, मुले आणि अबालवृद्धांची एकच धावपळ होते. घागर दोरीने शेंदून पाणी घेण्यासाठी आडावर एकच झुंबड उडते. टँकरमधून पडत असलेले पाणी घागरीत शेंदून घेण्यासाठी लगबग सुरू होते. सदर पाणी टंचाई लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात चार बोअर, विहीर अधिग्रहण व एका टँकरची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली होती. त्यातील दोन अधिग्रहणाचे स्रोत आटले असून एका टँकरद्वारे पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आणखी एका टँकरची व अधिग्रहणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून त्यास मान्यता मिळाली नसल्याचे उपसरपंच अमृत बसुदे यांनी सांगितले. 

हलगरा या गावात जलयुक्त शिवार व गावकºयांच्या श्रमदानातून चांगले काम झाले होते. याची दखल घेत २०१७ मध्ये मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी गावात भेट देऊन श्रमदान केले व गाव दत्तक घेतले होते. तेव्हापासून आजतागायत त्यांनी या गावास भेटही दिलेली नाही. यावर्षी भीषण दुष्काळ पडला. या भागातून वाहणाºया तेरणा, मांजरा नद्या आटल्या आहेत. गावाजवळील शिरसी तळे आटले आहे. पाणी टंचाई तीव्र झाली. मात्र उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ग्रामस्थ पाणी टंचाईचे चटके निमूटपणे सहन करीत आहेत.  

आडात शेकडो घागरींची गर्दी...गावाची तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून तीन आडात टँकरचे पाणी दोन दिवसाला एकदा सोडले जाते. पाणी आडात पडण्याअगोदरच शेकडो रिकाम्या घागरी आडात दोरीच्या साह्याने पाणी पडण्याची वाट पाहात भर उन्हात थांबतात. घरातील कर्ता पुरुष, महिला, आजी, मुले, मुली हातात कळशी, घागर घेऊन धावत सुटतात. जीव मुठीत घेऊन या आडावर पाणी भरले जात आहे.

 

पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाकडे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही लक्षच दिले नाही. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके यांनी सोमवारी येथे भेट देत ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनास भाग पाडू, असे आश्वासन दिले. हलगरा गावात तातडीने टँकर पाठविण्यासाठी तसेच अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना फोनवरून सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, सुधाकर पाटील, किशोर लंगोट, देवदत्त पाटील, मंगेश चव्हाण, भरत पाटील, समीद्दीन देशमुख, सुधीर मसलगे, सुरेश रोळे, दत्ता भिडे, आशीतोष मसलगे, संतोष गंगठडे, दत्ता जोशी, नंदकुमार जोशी आदी उपस्थित होते. 

दुसऱ्या टँकरसाठी प्रस्ताव...हलगरा गावात पाणी टंचाई तीव्र झाली आहे. चार विंधन विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत. त्यापैकी दोन बंद पडल्या. एका टँकरने आडात पाणी टाकले जात आहे. दुसºया टँकरच्या मागणीसाठी १० दिवसांपूर्वी प्रस्ताव दिला असल्याचे ग्रामसेवक निखिल माळी यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई