शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांची कुटुंब उद्धवस्त केली' - रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:47 IST

Maharashtra Assembly Election 2019 : राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री हे, एक निवडणूक जिंकली की दुसरी येणारी निवडणूक कशी जिंकायची व फोडाफाडीचे राजकरण कसे करायचे याच्याच तयारीत असतात.

मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्ष व विरोधकात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. सोमवारी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी बल्लारपूर येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांचा जीव घेतला असून त्यांची कुटुंब उद्धवस्त केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

बल्लारपूर येथील सभेत चाकणकर यांनी मुख्यमंत्री यांच्य्यावर टीका करताना म्हणाल्या की, ज्यावेळी मुख्यमंत्री विरोधात होते. त्यावेळी शेतकरी आत्महत्या झाल्यावर सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी फडणवीस हे करत होते. मात्र आता तर मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांचा जीव घेतला असून त्यांचे कुटुंब उद्धवस्त केला असल्याचा ठपका त्यांच्यावर असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला.

राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री हे, एक निवडणूक जिंकली की दुसरी येणारी निवडणूक कशी जिंकायची व फोडाफाडीचे राजकरण कसे करायचे याच्याच तयारीत असतात. त्यामुळे त्यांच्या सरकारने हे मान्य केलं आहे की, ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत असे लोकं मंत्री झाले आहेत. त्यामुळेच राज्याचा कारभार कसा चालवावा हे त्यांच्या मंत्र्यांना कळत नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी  केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणfarmer suicideशेतकरी आत्महत्या