शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांची कुटुंब उद्धवस्त केली' - रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:47 IST

Maharashtra Assembly Election 2019 : राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री हे, एक निवडणूक जिंकली की दुसरी येणारी निवडणूक कशी जिंकायची व फोडाफाडीचे राजकरण कसे करायचे याच्याच तयारीत असतात.

मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्ष व विरोधकात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. सोमवारी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी बल्लारपूर येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांचा जीव घेतला असून त्यांची कुटुंब उद्धवस्त केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

बल्लारपूर येथील सभेत चाकणकर यांनी मुख्यमंत्री यांच्य्यावर टीका करताना म्हणाल्या की, ज्यावेळी मुख्यमंत्री विरोधात होते. त्यावेळी शेतकरी आत्महत्या झाल्यावर सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी फडणवीस हे करत होते. मात्र आता तर मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांचा जीव घेतला असून त्यांचे कुटुंब उद्धवस्त केला असल्याचा ठपका त्यांच्यावर असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला.

राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री हे, एक निवडणूक जिंकली की दुसरी येणारी निवडणूक कशी जिंकायची व फोडाफाडीचे राजकरण कसे करायचे याच्याच तयारीत असतात. त्यामुळे त्यांच्या सरकारने हे मान्य केलं आहे की, ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत असे लोकं मंत्री झाले आहेत. त्यामुळेच राज्याचा कारभार कसा चालवावा हे त्यांच्या मंत्र्यांना कळत नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी  केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणfarmer suicideशेतकरी आत्महत्या