शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 14:18 IST

Maharashtra Political Crisis: निवडणुका लागल्यास मताधिक्य आणि आमदारांचा आकडा वाढेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

अहमदनगर: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनेही मध्यावती निवडणुका लागतील, असा दावा केला आहे. यानंतर आता मध्यावती निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केला आहे. 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागू शकतील, असा दावा केला होता. त्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही पवारांचीच री ओढत हे सरकार तात्पुरते असल्याचे म्हटले होते. तसेच आता निवडणुका लागल्यास शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून येतील, असा दावाही केला होता. यानंतर आता रोहित पवार यांनी आता निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या कर्जत दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यामांशी बोलत होते. 

निवडणुका लागल्या तर लढावे लागेलच

निवडणुका लागल्या तर लढावे लागतीलच. मात्र, निवडणुका लागू नये, त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. तसेच एखाद्या विषय चिघळल्यानंतर तो कोर्टात गेला तर निवडणुका घ्याव्याच लागतील, त्यावेळी सर्वांत जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील. गेल्या निवडणुकात काही फरकाने पराभूत झालेले आमदार निवडून येतील, तसेच आमच्या आमदारांचे मताधिक्यही वाढलेले दिसेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी यावेळी आमदार राम शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. राम शिंदे यांच्या आमदारकीमुळे तालुक्याला फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र ज्या पद्धतीने ते दहा वर्षांमध्ये वागले, त्याप्रमाणे तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. राम शिंदे यांना मंत्रीपद असताना अनेक गोष्टी प्रलंबित राहिल्या. आता विकास कामे होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असतील तर ते योग्य नाही. तसेच माझ्या दोन्ही तालुक्यात अन्याय झाला तर ते मी खपून घेणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी यावेळी दिला.

दरम्यन, निधी वाटपावरून केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य नाही. असे आरोप होत असतात. अजित पवार यांनी विधिमंडळात निधीवाटपाची आकडेवारीच दिली आहे. काही आमदार, मंत्री नाराज असल्याचे दाखवत असले, तरी त्यांना चांगला निधी गेल्याचे दिसत आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस