शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 14:18 IST

Maharashtra Political Crisis: निवडणुका लागल्यास मताधिक्य आणि आमदारांचा आकडा वाढेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

अहमदनगर: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनेही मध्यावती निवडणुका लागतील, असा दावा केला आहे. यानंतर आता मध्यावती निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केला आहे. 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागू शकतील, असा दावा केला होता. त्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही पवारांचीच री ओढत हे सरकार तात्पुरते असल्याचे म्हटले होते. तसेच आता निवडणुका लागल्यास शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून येतील, असा दावाही केला होता. यानंतर आता रोहित पवार यांनी आता निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या कर्जत दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यामांशी बोलत होते. 

निवडणुका लागल्या तर लढावे लागेलच

निवडणुका लागल्या तर लढावे लागतीलच. मात्र, निवडणुका लागू नये, त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. तसेच एखाद्या विषय चिघळल्यानंतर तो कोर्टात गेला तर निवडणुका घ्याव्याच लागतील, त्यावेळी सर्वांत जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील. गेल्या निवडणुकात काही फरकाने पराभूत झालेले आमदार निवडून येतील, तसेच आमच्या आमदारांचे मताधिक्यही वाढलेले दिसेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी यावेळी आमदार राम शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. राम शिंदे यांच्या आमदारकीमुळे तालुक्याला फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र ज्या पद्धतीने ते दहा वर्षांमध्ये वागले, त्याप्रमाणे तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. राम शिंदे यांना मंत्रीपद असताना अनेक गोष्टी प्रलंबित राहिल्या. आता विकास कामे होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असतील तर ते योग्य नाही. तसेच माझ्या दोन्ही तालुक्यात अन्याय झाला तर ते मी खपून घेणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी यावेळी दिला.

दरम्यन, निधी वाटपावरून केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य नाही. असे आरोप होत असतात. अजित पवार यांनी विधिमंडळात निधीवाटपाची आकडेवारीच दिली आहे. काही आमदार, मंत्री नाराज असल्याचे दाखवत असले, तरी त्यांना चांगला निधी गेल्याचे दिसत आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस