शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 16:37 IST

भारतीय संघ मुंबईत दाखल होत असून, येथे संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

मुंबई : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर विश्वविजेता भारतीय संघ आज मायदेशात परतला आहे. नवी दिल्ली विमानतळावर सर्व चाहत्यांनी संघाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. आता भारतीय संघ मुंबईत दाखल होत असून, येथे संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

मुंबईत भारतीय संघाची भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा गौरव कार्यक्रम होणार आहे. याकडे सर्व क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागले आहे. हजारो मुंबईकर हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवणार आहेत. दरम्यान, भारतीय संघाच्या मिरवणुकीसाठी जी बस सज्ज झाली आहे. ती बस खास गुजरातहून मागवण्यात आली आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

"आमचे खेळाडू चांगले खेळले. आम्ही विश्वचषक जिंकला. भारतीय संघ विश्वचषकासह महाराष्ट्रात, मुंबईत येत आहे. मग, ही विजयी मिरवणूक महाराष्ट्रातील बसमधूनच खासकरून मुंबईतील बेस्ट बसमधून काढायला हवी. कारण, मुंबई शहर प्रवासाच्या बाबतीत अत्यंत सुखद आहे, मग मुंबईत विश्वचषक येत असेल तर बेस्टच्या बसचा वापर केल्यास आम्हाला आनंद होईल", असे रोहित पवार म्हणाले. 

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, "भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीसाठी आलेल्या गुजरातच्या बसला आम्ही पार्किंगसाठी चांगली जागा देऊ. बीसीसीआयने मोठी आणि चांगली बस आणली असेल, पण आमच्या भावना बेस्टसोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे बेस्ट बसचा वापर केला पाहिजे. त्यासाठी आम्ही बीसीसीआयकडे विनंती करू, शेवटी तेच निर्णय घेतील", असे रोहित पवार यांनी म्हटले. 

दरम्यान, आज संध्याकाळी विश्वविजेत्या भारतीय संघाचा सत्कार वानखेडे स्टेडियम येथे होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय मिरवणूक आणि वानखेडेवर महोत्सव साजरा केला जाणार आहे. २९ जून रोजी बार्बाडोस येथे  झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता. 

महाराष्ट्रीयन खेळाडूंचा मुंबईत सत्कारटी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या चार महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार आहे. राज्य सरकारने या खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैयस्वाल हे चार खेळाडू आहेत. ज्यांचा समावेश विश्वचषक विजेत्या भारतीय संघामध्ये होता. तर भारतीय संघाचे बॉलिंग कोच पारस म्हांब्रे देखील मुंबईकर आहेत. या सर्वांचा विधीमंडळात सत्कार केला जाणार आहे.

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारTeam Indiaभारतीय क्रिकेट संघMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारT20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024T20 Cricketटी-20 क्रिकेटIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघICC World T20आयसीसी विश्वचषक टी-२०