शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अशक्य- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 06:35 IST

आंबडेकर यांचा वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत चांगली मते मिळाली. मात्र, मते खाण्याच्या आंबेडकरांच्या भूमिकेच्या मी विरोधात आहे, असे ते म्हणाले.

कल्याण : काही दिवसांपूर्वी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकरांना वगळून रिपब्लिकन ऐक्य केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, प्रकाश आंबेडकरांना वगळून रिपब्लिकन ऐक्य शक्य नाही, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.  महाड महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी गुरव यांची शोकसभा शनिवारी जीवनदीप महाविद्यालयात झाली. याप्रसंगी आमदार किसन कथोरे, महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे आणि रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या शोकसभेनंतर आठवले यांनी वरील वक्तव्य केले. आंबडेकर यांचा वंचित बहुजन आघाडीला निवडणुकीत चांगली मते मिळाली. मात्र, मते खाण्याच्या आंबेडकरांच्या भूमिकेच्या मी विरोधात आहे, असे ते म्हणाले.‘भाजपला हरविणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही’उत्तर प्रदेशात जे भाजप सोडून गेले, त्यामुळे त्यांचेच नुकसान होईल. त्यांच्या सोडून जाण्याने भाजपला  फरक पडणार नाही. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी कितीही प्रचार केला तरी भाजपला हरविणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असा टोला आठवले यांनी अखिलेश यांना लगावला.   

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRamdas Athawaleरामदास आठवले