शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 12:59 PM

दोन लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आश्वासनपूर्ती करण्याकडे वाटचाल केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्याचवेळी नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महाविकास आघाडीचे सरकार दिलासा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या पुढे कर्जमुक्ती देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जे शेतकरी कर्जाची  नियमीत परतफेड करतात, त्यांच्यासाठीही काही तरी दिलासा देणारी बाब प्रत्यक्षात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. 

मंदीच्या काळात शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होत असताना त्यांना कोणी वाली राहिला नाही. शेतकऱ्यांना मजबूत केले पाहिेजे. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही. दोन लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.