शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदलाची राज्यात भरती प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 07:00 IST

सैन्यदलातील विविध पदांसाठी युवकांना अर्ज करता येणार

ठळक मुद्देअनेक वर्षानंतर बेरोजगार युवकांना मिळणार दिलासा दहावी ते बारावी उत्तीर्ण झालेल्या युवकांना या मुळे चांगली संधी निर्माण राज्यातील ५ केंद्रांमार्फत ही भरती प्रक्रिया सुरू केंद्रामार्फत सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

प्रशांत ननवरे- बारामती : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली सैन्यदलाची भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.  राज्यातील ५ केंद्रांमार्फत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे बेरोजगारांना सैन्यदलात भरती होण्याची संधी मिळणार आहे. सैन्यदलातील विविध पदांसाठी युवकांना अर्ज करता येणार आहे.  दहावी ते बारावी उत्तीर्ण झालेल्या युवकांना या मुळे चांगली संधी निर्माण झाली आहे. लष्कर भरतीचे राज्यात पाच भरती केंद्र (आर्मी रिक्रुटिंग ऑफिस)आहे. या केंद्रामार्फत सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. भरतीमध्ये सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्क, स्टोअर किपर, सोल्जर नर्सिंग असिस्टंट, सोल्जर ट्रेड्समन या पदांचा समावेश आहे. यासाठी नोंदणी १ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारांची कागदपत्रे तपासणे, मैदानी चाचणी, दि. ४ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत बीड मधील सैनिक विद्यालयात होणार आहे. पुणे सैन्य भरती केंद्राच्या अंतर्गत पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर या ५ जिल्ह्यातील उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येईल.त्याचप्रमाणे मुंबई सैन्य भरती केंद्रामार्फत आॅनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. १३ आॅक्टोबरला सुरू झालेली ही नोंदणी २७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांची  प्रत्यक्ष कागदपत्रे व मैदान चाचणी १३ ते २३ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील मुंब्रा येथे अब्दुल कलाम आझाद स्पोटर्स स्टेडियम येथे सुरू होणार आहे. या मुंबई केंद्रांतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड या ६ जिल्ह्यातील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. औरंगाबाद केंद्रामध्ये आॅनलाईन नोंदणी ५ नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. ती १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांची कागदपत्र तपासणी व प्रत्यक्ष मैदानी चाचणी ४ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे होणार आहे. तसेच कोल्हापूर भरती केंद्र, नागपूर भरती केंद्राची सैन्य भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये विविध पदांसाठी वेगवेगळ्या शारीरिक चाचण्या आहेत. या चाचणींमध्ये पदनिहाय वेगवेगळ्या शरीरिक चाचण्या होतील. यामध्ये उंची, छाती, वजन आदी मोजमाप महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच, १६०० मीटर धावणे, पुलअप्स काढण्यासाठी स्वतंत्र गुण ठेवण्यात आले आहेत. कागदपत्र तपासणीमध्ये मूळ कागदपत्रासह दोन प्रमाणित केलेल्या झेरॉक्स, नोंदणी केल्यानंतर मिळणारे अ‍ॅडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्र, वर्तणूक दाखला, चारित्र्य दाखला, आॅफिडेव्हीट आदी कागदपत्रे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या घेतल्या जाणाºया वैद्यकीय चाचणीमध्ये दृष्टीदोष, दात, हिरड्या, टॅट्यू आदीची तपासणी केली जाते. यामध्ये, पात्र झाल्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ५० प्रश्नांना १०० गुण ठेवण्यात आले आहे. या लेखी परीक्षेसाठी ६० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. परीक्षेत ३० गुणांसाठी सामान्य ज्ञान, ३० गुणांसाठी विज्ञान तंत्रज्ञान, ३० गुणांसाठी गणित, १० गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या घटकांचा समावेश होतो. याबाबत बारामती येथील ‘सह्याद्री करिअर’चे प्रमुख उमेश रूपनवर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, सैन्यभरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन नोंदणी  आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवाराने संबंधित भरती केंद्र आणि नोंदणीसाठी आवश्यक कालावधी समजून घ्यावा. त्यानंतरच भरतीचे परीपूर्ण नियोजन करावे. मैदानी चाचणीचे बारकावे समजून घेतल्यास सैन्यभरतीमध्ये उमेदवारांना यश मिळेल. मात्र, उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील रूपनवर यांनी केले आहे.———————————

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवान