शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

Coronavirus :राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा उच्चांक; दिवसभरात ६८ हजार ६३१ बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 5:52 AM

दिवसभरात ६८ हजार ६३१ रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. या उलट राज्यातील रोज दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येचा उच्चांक गाठत असल्याने कोरोनाचे संकट राक्षसाचे रुप धारण करत आहे. राज्यात रविवारी ६८ हजार ६३१ रुग्ण आणि ५०३ मृत्यूंची नोंद झाली आहे, परिणामी कोरोना बाधितांची एकूण संख्या ३८ लाख ३९ हजार ३३८ असून मृतांचा एकूण आकडा ६० हजार ४७३ झाला आहे.

सध्या राज्यात ६ लाख ७० हजार ३८८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आऱोग्य विभागाने दिली आहे. राज्यात मागील २४ तासांत ४५ हजार ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ५०३ ५०३ मृत्यूंमध्ये मुंबई ५३, ठाणे १३, ठाणे मनपा ५, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा १, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ३, रायगड १७, पनवेल मनपा ४, नाशिक २, नाशिक मनपा ३, अहमदनगर ६१, अहमदनगर मनपा २७, जळगाव २४, जळगाव मनपा १६, नंदूरबार १९, पुणे ९, पुणे मनपा ३६, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ४,  कोल्हापूर १, सांगली ४, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, जालना ४, परभणी ९, परभणी मनपा ८, लातूर १३, लातूर मनपा ६, उस्मानाबाद १२, नांदेड १३, नांदेड मनपा ११, अकोला १, अकोला मनपा ४, अमरावती २, अमरावती मनपा १, यवतमाळ १०, वाशिम ४, नागपूर ५,  रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत दिवसभरात ८ हजार ४७९ रुग्ण, तर ५३ मृत्यूराज्यासह मुंबईत कठोर नियम लावल्यानंतरही दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्यूंच्या संख्येत फरक पडलेला नाही. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता गडद होत असून, प्रशासनासमोर नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. मुंबईत रविवारी ८ हजार ४७९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाख ७९ हजार ३११वर पोहोचला आहे तर रविवारी ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १२ हजार ३४७वर पोहोचला आहे. ८,७८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ४ लाख ७८ हजार ३९वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यात ५०१३ रुग्णांची वाढnठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार १३ रुग्ण रविवारी आढळले. जिल्ह्यातील रुग्णसंख्येत एक आठवड्यापासून एक हजारापेक्षा अधिक रुग्णांची घट झाली आहे. मात्र मृतांची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. आज जिल्ह्यात ४२ जणांचे निधन झाले. जिल्ह्यात आता चार लाख १६ हजार ३८१ रुग्णांसह मृतांची संख्या सहा हजार ९४२ नोंदवली आहे.nठाणे शहरात एक हजार ५९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख सहा हजार ३२४ झाली आहे. या शहरात पाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ५५२ झाली. कल्याण-डोंबिवलीत एक हजार ४७५ रुग्णांची वाढ झाली असून पाच जणांचे मृत्यू झाले. आता एक लाख सहा हजार ३३ बाधितांसह एक हजार ३२२ मृत्यूची नोंंद करण्यात आली.nउल्हासनगरमध्ये १८० रुग्ण सापडले असून चार जणांचे मृत्यू झाले. येथील बाधितांची संख्या १७ हजार २७० झाली. भिवंडीला ७१ बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. मीरा-भाईंदरमध्ये ३३७ रुग्ण आढळले असून ११ मृत्यू आहे. अंबरनाथमध्ये १२२ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. येथे बाधित १५ हजार २८२ असून मृत्यू ३४२ झाले आहेत. बदलापूरमध्ये २२७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १६ हजार २५२ झाले आहेत. 

nमुंबईत सध्या ८७ हजार ६९८ सक्रिय रुग्ण आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४५ दिवस इतका आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस