शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
7
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
8
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
9
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
11
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
12
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
13
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
14
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
15
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
16
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
17
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
18
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
19
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
20
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus :राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा उच्चांक; दिवसभरात ६८ हजार ६३१ बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 05:54 IST

दिवसभरात ६८ हजार ६३१ रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. या उलट राज्यातील रोज दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येचा उच्चांक गाठत असल्याने कोरोनाचे संकट राक्षसाचे रुप धारण करत आहे. राज्यात रविवारी ६८ हजार ६३१ रुग्ण आणि ५०३ मृत्यूंची नोंद झाली आहे, परिणामी कोरोना बाधितांची एकूण संख्या ३८ लाख ३९ हजार ३३८ असून मृतांचा एकूण आकडा ६० हजार ४७३ झाला आहे.

सध्या राज्यात ६ लाख ७० हजार ३८८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आऱोग्य विभागाने दिली आहे. राज्यात मागील २४ तासांत ४५ हजार ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ५०३ ५०३ मृत्यूंमध्ये मुंबई ५३, ठाणे १३, ठाणे मनपा ५, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा १, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ३, रायगड १७, पनवेल मनपा ४, नाशिक २, नाशिक मनपा ३, अहमदनगर ६१, अहमदनगर मनपा २७, जळगाव २४, जळगाव मनपा १६, नंदूरबार १९, पुणे ९, पुणे मनपा ३६, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ४,  कोल्हापूर १, सांगली ४, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, जालना ४, परभणी ९, परभणी मनपा ८, लातूर १३, लातूर मनपा ६, उस्मानाबाद १२, नांदेड १३, नांदेड मनपा ११, अकोला १, अकोला मनपा ४, अमरावती २, अमरावती मनपा १, यवतमाळ १०, वाशिम ४, नागपूर ५,  रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत दिवसभरात ८ हजार ४७९ रुग्ण, तर ५३ मृत्यूराज्यासह मुंबईत कठोर नियम लावल्यानंतरही दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्यूंच्या संख्येत फरक पडलेला नाही. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता गडद होत असून, प्रशासनासमोर नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. मुंबईत रविवारी ८ हजार ४७९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाख ७९ हजार ३११वर पोहोचला आहे तर रविवारी ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १२ हजार ३४७वर पोहोचला आहे. ८,७८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ४ लाख ७८ हजार ३९वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यात ५०१३ रुग्णांची वाढnठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार १३ रुग्ण रविवारी आढळले. जिल्ह्यातील रुग्णसंख्येत एक आठवड्यापासून एक हजारापेक्षा अधिक रुग्णांची घट झाली आहे. मात्र मृतांची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. आज जिल्ह्यात ४२ जणांचे निधन झाले. जिल्ह्यात आता चार लाख १६ हजार ३८१ रुग्णांसह मृतांची संख्या सहा हजार ९४२ नोंदवली आहे.nठाणे शहरात एक हजार ५९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख सहा हजार ३२४ झाली आहे. या शहरात पाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ५५२ झाली. कल्याण-डोंबिवलीत एक हजार ४७५ रुग्णांची वाढ झाली असून पाच जणांचे मृत्यू झाले. आता एक लाख सहा हजार ३३ बाधितांसह एक हजार ३२२ मृत्यूची नोंंद करण्यात आली.nउल्हासनगरमध्ये १८० रुग्ण सापडले असून चार जणांचे मृत्यू झाले. येथील बाधितांची संख्या १७ हजार २७० झाली. भिवंडीला ७१ बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. मीरा-भाईंदरमध्ये ३३७ रुग्ण आढळले असून ११ मृत्यू आहे. अंबरनाथमध्ये १२२ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. येथे बाधित १५ हजार २८२ असून मृत्यू ३४२ झाले आहेत. बदलापूरमध्ये २२७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १६ हजार २५२ झाले आहेत. 

nमुंबईत सध्या ८७ हजार ६९८ सक्रिय रुग्ण आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४५ दिवस इतका आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस